शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

...तर कचरा उचलणे बंद!

By admin | Updated: June 7, 2017 02:38 IST

मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या आणि वसाहती यांच्याकडून या नियमांचे पालन केले जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुका आणि ओला कचरा वेगळ्या डब्यात ठेवण्याची सक्ती केल्यानंतरही मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या आणि वसाहती यांच्याकडून या नियमांचे पालन केले जात नाही. गेल्या चार महिन्यांत अशा सुमारे ३५ हजार सोसायट्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. मात्र संबंधित कारवाईला बहुतांशी सोसायट्या जुमानत नसल्याने कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटींचा कचरा उचलणेच बंद करण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे.ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण होण्यासाठी २००२ पासून पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र केंद्र सरकारने स्वच्छ  भारत अभियान राबविण्यास सुरुवात केल्यानंतर या योजनेला गती मिळाली. दरम्यान, देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात येत असल्यामुळे आणि याबाबत न्यायालयानेही आदेश दिल्याने याची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार कचरा वर्गीकरण करण्यासाठी सोसायट्यांना नोटीस पाठविण्यात येत आहेत.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत तब्बल २३ हजार १६१ सोसायट्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, या नोटीसनंतरही सोसायटी आणि वसाहतींकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या सोसायट्यांवर कारवाई करण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे. सोसायट्यांना नोटीसची दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी त्यांचा कचरा उचलायचा नाही, असा पालिकेचा विचार सुरू आहे. कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबतची अट २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या बांधकामांच्या ‘आयओडी’मध्ये घालण्यात आली आहे. तर वीस हजार चौरस मीटरहून कमी क्षेत्रफळाच्या सोसायट्यांकडून कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी होत नसल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. कचरा वर्गीकरण करता यावा म्हणून प्रत्येक सोसायटीला २५० लीटरच्या दोन स्वतंत्र कचरापेट्या देण्यात आल्या आहेत. नगरसेवकांच्या वतीने दहा लीटर क्षमतेच्या दोन कचरापेट्या ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी वितरित करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबईतील अनेक रस्त्यांवर तसेच रेल्वे स्थानकांवर ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी दोन स्वतंत्र कचरापेट्या आहेत.शहर उपनगरातील सोसायट्यांना नोटीसवांद्रे, सांताक्रूझ पश्चिम : ५३२८बोरीवली : ४७७१प्रभादेवी, वरळी, लोअर परेल : ३३६५दादर, माहीम, धारावी : २३४५वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व : १९७२पर्यायी डम्पिंगची प्रक्रिया सुरू मुंबईत प्रतिदिन नऊ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या सर्व कचऱ्याची विल्हेवाट देवनार, मुलुंड आणि कांजूर डम्पिंग ग्राउंडवर केली जाते. क्षमता संपत आल्यानंतरही मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकला जातो, तर कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. याच दरम्यान तळोजा आणि ऐरोली येथे पर्यायी डम्पिंग ग्राउंड निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.