शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मोजके पदार्थ, मोजका थाटमाट

By admin | Updated: November 29, 2015 01:59 IST

आर्थिक सुबत्ता दाखविण्यासाठी विवाहात अनावश्यक खर्च केले जातात. लग्न पत्रिका, भोजन, फटाक्यांची आतषबाजी यासह अन्य बाबींवर मोठ्या प्रमाणात अवास्तव खर्च करण्यात येतो. काही लग्नांमध्ये

- विजयकुमार सैतवाल,  जळगावआर्थिक सुबत्ता दाखविण्यासाठी विवाहात अनावश्यक खर्च केले जातात. लग्न पत्रिका, भोजन, फटाक्यांची आतषबाजी यासह अन्य बाबींवर मोठ्या प्रमाणात अवास्तव खर्च करण्यात येतो. काही लग्नांमध्ये तर खाद्यपदार्थांची मोठी रेलचेल असते, त्यामुळे अन्न वाया जाते. हे टाळण्यासाठी जळगावातील सकल जैन समाजासाठी आदर्श नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मोजकेच खाद्यपदार्थ करण्यासह थाटमाटालाही आवर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरा मुलगा अथवा नवरी मुलगी यांची हौसमौस व्हावी, तसेच सुबत्तेचे दर्शन घडविण्यासाठी विवाह समारंभात मोठा खर्च करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून येते. मात्र, जळगावातील सकल जैन समाजाने पुढाकार घेत, अनावश्यक खर्चाला पायबंद घालण्यासाठी एक नियमावलीच तयार केली. समाजबांधवांची बैठक होऊन त्यात सर्वानुमते अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात खाद्यपदार्थ मर्यादित ठेवण्यावर एकमत झाले. समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी श्रीमंतांनी काटकसर केल्यास वावगे नाही, स्वत:पासूनच परिवर्तनाचे पाऊल उचलण्याचे आवाहन अशोक जैन यांनी केले.यथोचित सत्कार होणारसकल जैन बांधवांच्या घरोघरी नियमावली पाठविण्यात येणार असून, लग्नसमारंभ अथवा इतर कोणत्याही कार्यक्रमात त्याचे पालन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अवाढव्य खर्च करणाऱ्यांच्या लग्नाला जायचे. मात्र, न जेवताच परत यायचे, असा विचार ठेवण्यात आला आहे.अहिंसा तत्त्व पाळाजैन समाजात अहिंसेला मोठे स्थान आहे. रात्रीचे समारंभ बंद करण्याचाही विचार मांडण्यात आला. रात्री मोठ्या दिव्यांमुळे कीडे-किटक यांचा मृत्यू होऊ शकतो. आपले पूर्वज रात्री जेवत नव्हते, याचीही जाणीव या निमित्ताने करून देण्यात येणार आहे. पदार्थांची संख्या मर्यादितसामूहिक भोजन व विवाह कार्यक्रमात नाष्ट्यासाठी नऊ, भोजनात २१, कुंकुममध्ये ३ तर धार्मिक व सामाजिक भोजनात १० पदार्थ असावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.पाच सदस्यांची समिती जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती तयार केली होती. त्यात दिलीप गांधी, अजय ललवाणी, अनिल देसर्डा, महेंद्र जैन, प्रदीप मुथा यांचा समावेश होता. त्यांनी नियमावली तयार करून बैठकीत मांडली.लग्न समारंभात अन्न वाया जाते. ते भुकेल्यांना मिळावे, तसेच इतर गोष्टींवर करण्यात येणारा अनाठायी खर्चाला आळा बसला पाहिजे. यासाठी आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे. - दलुभाऊ जैन, सकल जैन समाज समाज संघपती, जळगाव