शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
3
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
4
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
5
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
6
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
7
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
8
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
9
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
10
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
11
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
12
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
13
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
14
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
15
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
16
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
17
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
18
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
19
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
20
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
Daily Top 2Weekly Top 5

मोजके पदार्थ, मोजका थाटमाट

By admin | Updated: November 29, 2015 01:59 IST

आर्थिक सुबत्ता दाखविण्यासाठी विवाहात अनावश्यक खर्च केले जातात. लग्न पत्रिका, भोजन, फटाक्यांची आतषबाजी यासह अन्य बाबींवर मोठ्या प्रमाणात अवास्तव खर्च करण्यात येतो. काही लग्नांमध्ये

- विजयकुमार सैतवाल,  जळगावआर्थिक सुबत्ता दाखविण्यासाठी विवाहात अनावश्यक खर्च केले जातात. लग्न पत्रिका, भोजन, फटाक्यांची आतषबाजी यासह अन्य बाबींवर मोठ्या प्रमाणात अवास्तव खर्च करण्यात येतो. काही लग्नांमध्ये तर खाद्यपदार्थांची मोठी रेलचेल असते, त्यामुळे अन्न वाया जाते. हे टाळण्यासाठी जळगावातील सकल जैन समाजासाठी आदर्श नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मोजकेच खाद्यपदार्थ करण्यासह थाटमाटालाही आवर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरा मुलगा अथवा नवरी मुलगी यांची हौसमौस व्हावी, तसेच सुबत्तेचे दर्शन घडविण्यासाठी विवाह समारंभात मोठा खर्च करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून येते. मात्र, जळगावातील सकल जैन समाजाने पुढाकार घेत, अनावश्यक खर्चाला पायबंद घालण्यासाठी एक नियमावलीच तयार केली. समाजबांधवांची बैठक होऊन त्यात सर्वानुमते अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात खाद्यपदार्थ मर्यादित ठेवण्यावर एकमत झाले. समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी श्रीमंतांनी काटकसर केल्यास वावगे नाही, स्वत:पासूनच परिवर्तनाचे पाऊल उचलण्याचे आवाहन अशोक जैन यांनी केले.यथोचित सत्कार होणारसकल जैन बांधवांच्या घरोघरी नियमावली पाठविण्यात येणार असून, लग्नसमारंभ अथवा इतर कोणत्याही कार्यक्रमात त्याचे पालन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अवाढव्य खर्च करणाऱ्यांच्या लग्नाला जायचे. मात्र, न जेवताच परत यायचे, असा विचार ठेवण्यात आला आहे.अहिंसा तत्त्व पाळाजैन समाजात अहिंसेला मोठे स्थान आहे. रात्रीचे समारंभ बंद करण्याचाही विचार मांडण्यात आला. रात्री मोठ्या दिव्यांमुळे कीडे-किटक यांचा मृत्यू होऊ शकतो. आपले पूर्वज रात्री जेवत नव्हते, याचीही जाणीव या निमित्ताने करून देण्यात येणार आहे. पदार्थांची संख्या मर्यादितसामूहिक भोजन व विवाह कार्यक्रमात नाष्ट्यासाठी नऊ, भोजनात २१, कुंकुममध्ये ३ तर धार्मिक व सामाजिक भोजनात १० पदार्थ असावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.पाच सदस्यांची समिती जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती तयार केली होती. त्यात दिलीप गांधी, अजय ललवाणी, अनिल देसर्डा, महेंद्र जैन, प्रदीप मुथा यांचा समावेश होता. त्यांनी नियमावली तयार करून बैठकीत मांडली.लग्न समारंभात अन्न वाया जाते. ते भुकेल्यांना मिळावे, तसेच इतर गोष्टींवर करण्यात येणारा अनाठायी खर्चाला आळा बसला पाहिजे. यासाठी आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे. - दलुभाऊ जैन, सकल जैन समाज समाज संघपती, जळगाव