शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्यातूनच उचलले जाते टोकाचे पाऊल

By admin | Updated: May 27, 2017 02:32 IST

व्यक्ती अधिक काळ तणावाखाली असल्यास दोन प्रकारे व्यक्त होते. काही जण स्वत:ला क्लेष करून घेतात. नैराश्यातून भावनिक संताप वाढत गेल्यास दुसऱ्यावर राग निघतो.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : व्यक्ती अधिक काळ तणावाखाली असल्यास दोन प्रकारे व्यक्त होते. काही जण स्वत:ला क्लेष करून घेतात. नैराश्यातून भावनिक संताप वाढत गेल्यास दुसऱ्यावर राग निघतो. यामुळे तणाव, नैराश्यावर तत्काळ उपचार करणे, त्या व्यक्तीला समजून घेणे गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. सांताक्रुझ येथे राहणाऱ्या सिद्धांत गणोरे याने आईच्या हत्येची कबुली दिल्यावर पुन्हा एकदा वाढता ताण हा प्रश्न चर्चेत आला. केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले, अनेकदा मुले नैराश्याच्या गर्तेत अडकत जातात. या मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आजच्या काळात सर्वांवर मानसिक दबाव असतो. अनेक जबाबदाऱ्या असतात, पण प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीतील क्षमता ओळखणे गरजेचे आहे. अनेकदा येथे गल्लत होते. व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण केल्याने ताण वाढत जातो. तरुणांची सहनशीलता वाढवण्याची आवश्यकता आहे. भावनिक संतापाचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. भावनिक संताप व्यक्त करण्यासाठी व्यक्ती अशा पद्धतीचे पाऊल उचलू शकते. अशा वेळी व्यक्ती अनेकदा स्वत:वरही चिडलेल्या असतात. या वेळी त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले, गणोरे प्रकरणात दोन शक्यता आहेत. एक म्हणजे त्या मुलाला मानसिक आजार असू शकतो अथवा त्याच्या मनात खूप काळ राग साचून राहिलेला असू शकतो. आई आणि मुलाचे नाते हे खूप वेगळे असते. जन्माला येण्याआधी ९ महिने आईच्या उदरात त्यांचा संबंध जोडलेला असतो. त्यामुळे मुलाने वडिलांची हत्या केली हे प्रकार दिसून येतात, पण आईची हत्या असे प्रकार दुर्मीळ असतात. प्रत्येक घरामध्ये भांडणे होत असतात, पण असे कृत्य करण्यामागे नक्की कारण काय, हे शोधण्यासाठी तपासणी करणे आवश्यक आहे. मानसिक आजार असल्यास व्यक्ती असे करू शकते. अथवा त्याच्या मनात खूपच राग असू शकतो. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या म्हणण्यानुसार, या मुलाला आपण वाईट कृत्य करतो आहोत याची जाणीव असणार. यानंतर आपण पकडले गेलो तर शिक्षा होऊ शकते. त्यामुळेच त्याने मेसेज लिहिला असण्याची शक्यता आहे. अनेक घरांमध्ये अस्वस्थता असते. प्रत्येक व्यक्तीला पे्रम मिळतेच असे नाही. पण त्या व्यक्तीला स्वीकारले आहे, ही भावना महत्त्वाची असते. स्वीकारले नाही तर त्यांचे मानसिक संतुलन बिघडू शकते.