शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्यव्यापी संघर्ष करणार : डॉ. बाबा आढाव

By admin | Updated: June 2, 2014 22:52 IST

केंद्र शासनाने संरक्षण उत्पादन व प्रकल्पांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला आहे.

पुणे : केंद्र शासनाने संरक्षण उत्पादन व प्रकल्पांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला आहे. हा निर्णय अंतिम संरक्षणांसंबंधी प्रकल्पांकरता परकीय गुंतवणूकदार जमिनी ताब्यात घेतील आणि त्यामुळे विस्थापित होणार्‍यांनी आपल्याच देशातील सैन्यांशी संघर्ष करायचा काय? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे सरचिटणीस डॉ. बाबा आढाव यांनी येथे केला. धरण व प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांविषयी परिषदेची राज्यव्यापी बैठक रविवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकारी उदयोग समूहाचे अध्यक्ष वैभव नायकवडी हे होते. आढाव म्हणाले, देशात पुनर्वसनाचा कायदा करणारे पहिले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे.राज्याचा पुरोगामी चेहरा ठळक करणारा हा कायदा महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या लढ्यातून झाला. दिवगंत दत्ता देशमुख,नागनाथअण्णा नायकवाडी यांसारखे समर्थ व लढाऊ नेतृत्व लाभलेल्या या संघटनेसमोर आजचे हे नवे आव्हान उभे राहत आहे. धरण व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न राज्य सरकारने तातडीने न सोडविल्यास परिषद राज्यव्यापी संघर्ष करेल. तसेच धरणग्रस्तांविषयी कोणताही निर्णय सरकार परस्पर घेते. परिषदेने आपल्या लढ्यातून एवढी ताकद उभी करावी की असे निर्णय घेण्याआधी शासन परिषदेशी चर्चा करेल. बैठकीचे प्रास्ताविक परिषदेचे उपाध्यक्ष लक्ष्मण पासलकर यांनी केले. यावेळी महसूल विभाग निहाय राज्यातील पुनर्वसन कामाचा आढावा घेण्यात आला.