शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

राज्याचे निर्णय केवळ कागदावरच

By admin | Updated: May 28, 2014 04:10 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही आघाडी सरकार राज्यात गतीने निर्णय घेताना दिसत नाही.

अतुल कुलकर्णी, मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही आघाडी सरकार राज्यात गतीने निर्णय घेताना दिसत नाही. कागदावरचे निर्णय या सरकारच्या कार्यकाळात प्रत्यक्षात उतरतील का, या धास्तीने सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांच्यादेखील झोपा उडाल्या आहेत. झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणारी यंत्रणाच राज्यात उरलेली नाही. मंत्री व आमदार अधिकार्‍यांकडे तर अधिकारी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. परिणामी अनेक महत्त्वाचे निर्णय ठंड्या बस्त्यात पडून आहेत. गृहनिर्माण धोरणावर राष्टÑपतींनी स्वाक्षरी करून तीन महिने झाले तरी हा कायदा राज्यात लागू झालेला नाही. आराखडा तयार आहे पण त्यावर निर्णयच होत नाही. टोलचे धोरण लोकसभा निवडणुकांच्या आधी आणले जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज ठाकरेंच्या शिष्ठमंडळाला सांगितले होते. निवडणुका झाल्या, निकाल लागले, आचारसंहिता संपून केंद्रात नवे सरकार कामाला लागले; पण टोलचे धोरण अजून कागदावरही उतरलेले नाही. उलट नवी मुंबईत वाशीनंतर कळंबोलीच्या आधी आणखी एक टोलनाका नव्याने सुरू होत आहे. दोन टोलनाक्यांमधल्या अंतराचे निकषही या टोलनाक्यानेदेखील ‘विशेष बाब’ या गोंडस नावाखाली बासनात गुंडाळून टाकले आहेत. वांद्रे-वरळी सी लिंक झाल्यानंतर पुढे तो हाजीअलीपर्यंत करण्याचा विषय राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मांडला तेव्हा त्यापेक्षा आणखी थोड्या पैशात मरिन ड्राइव्ह ते बोरीवलीपर्यंत कोस्टल रोड होऊ शकतो असे सादरीकरण केले गेले, त्याला मान्यता दिली गेली; पण पुढे त्याचेही काही झाले नाही. मग रिलायन्सने वरळी (पान ५ वर)