शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

राज्यात चाराटंचाई जाणवणार

By admin | Updated: August 24, 2015 01:20 IST

पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, गुरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार असल्याने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत राज्यात

अकोला : पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, गुरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार असल्याने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत राज्यात चारा लागवडीचे नियोजन कृषी विभागाच्या पातळीवर करण्यात येत आहे. मराठवाडा व राज्यातील इतर भागात पाऊसच नसल्याने आताच चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, शासनाने परप्रांतातून चारा आणण्याची तयारी सुरू केली आहे. यावर्षी पावसाने संपूर्ण मराठवाड्याकडे पाठ फिरवली असून, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम विदर्भातील अनेक भागांत पाऊस नसल्याने या भागातील खरीप हंगामातील पिकांसह गुराच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यात चारा लागवड कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. रब्बी हंगामातही चारा लागवड करण्यात येणार असून, चारा बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंधराशे रुपये अनुदान दिले जाणार आहे.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फतही वैरण विकास कार्यक्रमावर भर देण्यात येत आहे. मराठवाडा व इतर विभागातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी लगतच्या मध्य प्रदेश व कर्नाटक राज्यातून चारा आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.