शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

राज्यातील पोलिसपाटील मानधनापासून वंचित

By admin | Updated: July 6, 2014 23:27 IST

राज्यातील पोलिसपाटील गेल्या अनेक दिवसांपासून मानधनापासून वंचित आहेत.

रिसोड : गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिस पाटलाकडे असते. तसेच पोलिस प्रशासन व गावातील नागरिकांमधील दुवा म्हणून पोलिस पाटील मोलाची कामगिरी पार पाडतात. मात्र, ही जबाबदारी पार पाडणारे राज्यातील पोलिसपाटील गेल्या अनेक दिवसांपासून मानधनापासून वंचित आहेत. याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. शासनाच्या वतीने प्रत्येक गावासाठी एक पोलिसपाटील अशी नियुक्ती केलेली आहे. गावात शांतता राखणे, कायदा-सुव्यवस्थेला अबाधित ठेवणे, गावातील शांततेला बाधा पोहोचविणारी कोणतीही घटना घडली की, पोलिस स्टेशनला ती तात्काळ कळविणे, महत्वाचे सण-उत्सव, यात्रा, निवडणुका आदी काळामध्ये पोलिस पाटलाला अतिशय चौकसपणे राहावे लागते. पोलिस स्टेशनला, ठाणेदाराला अचूक माहिती द्यावी लागते. त्याला पोलिसांप्रमाणे ऑन ड्युटी २४ तास कार्यतत्पर राहावे लागते. या बदल्यात त्यांना मानधनापोटी महिना तीन हजार रुपये देण्यात येतात. ३१ डिसेंबर २0१३ पर्यत पोलिस पाटलांना केवळ ८00 रुपये मानधन दिले जात होते. त्या वाढ होण्यासाठी पोलिसपाटलांच्या अनेक संघटनांनी वारंवार निवेदने देऊन , स्मरणपत्रे दिली होती. त्यामुळे १ जानेवारी २0१३ पासून पोलिस पाटलांना दरमहा तीन हजार रुपयांचे मानधन मंजूर करण्यात आले. राज्यातील सर्व पोलिसपाटलांचे मानधन ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र ती अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. त्यात प्रत्येक पोलिसस्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व पोलिसपाटलांचे मानधन संबंधित ठाणेदाराच्या खात्यात जमा केले जाते. त्यानंतर त्यांच्याकडून ते प्रत्येक पोलिस पाटलाच्या खात्यात जमा केले जाते. दरम्यान सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तीन महिन्यांपासून पोलिस पाटलांना मानधन मिळालेले नाही. काही जिल्ह्यात चार तर काही जिल्ह्यात पाच-सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. वाशिम जिल्ह्यातील पोलिस पाटलांना डिसेंबर २0१३ पासून पोलिस पाटलांना मानधन मिळालेले नाही.