शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

राज्य सरकारची बजेटला ४0% कात्री

By admin | Updated: July 5, 2014 04:28 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना राबविण्यासाठी प्रत्येक विभाग जोरदार कामाला लागलेला असताना वित्त विभागाने मात्र कोणत्याही परिस्थितीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च करता येणार नाही

अतुल कुलकर्णी, मुंबईयेऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना राबविण्यासाठी प्रत्येक विभाग जोरदार कामाला लागलेला असताना वित्त विभागाने मात्र कोणत्याही परिस्थितीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च करता येणार नाही, असे आदेश बजावले आहेत. शिवाय कागदोपत्री खर्च झाल्याचे दाखवू नका, इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमद्वारेच आलेली बिले मंजूर करा, अशा अनेक सूचना करीत आर्थिक बेशिस्तीला लगाम लावण्याचे कामदेखील वित्त विभागाने केले आहे.या निर्णयामुळे आता कोणत्याही विभागाला अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या एकूण वार्षिक तरतुदीच्या ६० टक्क्यांच्या मर्यादेतच निधी मिळणार आहे. २०१४-१५च्या पहिल्या आठ महिन्यांकरिता म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंतचाच खर्च यामुळे करता येईल. डिसेंबरच्या आत नवीन सरकार सत्तेवर येणे अपेक्षित आहे. सन २०१४-१५च्या अर्थसंकल्पात अशा काही बाबी आहेत की त्यासाठी नवीन पदनिर्मिती आवश्यक आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय ही पदनिर्मिती करता येणार नाही, असेही या आदेशात स्पष्ट केल्यामुळे नवीन भरतीवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदाने वितरित करण्यापूर्वी संबंधित संस्थांकडून राज्य शासनास येणे असणाऱ्या रकमांचा आढावा घ्या, त्या रकमा आधी वसूल करा व मगच उर्वरित अनुदान वितरित करा, असेही त्यात म्हटले आहे. याचा फटका राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिकांना बसणार आहे. कारण अनेकांकडे मिळणाऱ्या अनुदानापेक्षा राज्य सरकारचे देणे जास्त आहे.आमदार निधी वाचला!वित्त विभागाच्या तावडीतून आमदार निधीची मात्र सहीसलामत सुटका झाली आहे. बजेटच्या ६० टक्के खर्च करण्याचा नियम आमदार निधीला लागू नाही. आमदारांचा निधी मात्र १०० टक्के वितरित केला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये येणाऱ्या आमदारांना नव्याने चार महिन्यांसाठी वेगळा निधी वित्त विभागाला द्यावा लागणार आहे.