शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

बलात्कार पीडितांच्या अर्थसाह्यात राज्य सरकार वाढ करणार

By admin | Updated: April 6, 2017 05:42 IST

बलात्कार व अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या अर्थसाह्यात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मांडला

मुंबई : बलात्कार व अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या अर्थसाह्यात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मांडला असून, येत्या सहा आठवड्यांत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयाला दिली.आॅक्टोबर २०१३मध्ये राज्य सरकारने ‘मनोधैर्य योजना’ अंमलात आणत, अत्याचारग्रस्त महिलांना तीन लाख रुपयांपर्यंत अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला. काही गुन्ह्यांचे गांभीर्य आणि पीडितांची स्थिती पाहून अर्थसाह्य वाढवून द्या, अशी सूचना गेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. सध्याच्या काळात पीडितांना अर्थसाह्य म्हणून देण्यात येणारे तीन लाख रुपये अत्यल्प आहेत. त्यामुळे ही रक्कम दहा लाख रुपये असावी, अशी सूचनाही न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. या सूचनेवर राज्य सरकारने विचार केला असून, तसा प्रस्ताव मांडला आहे. येत्या सहा आठवड्यांत त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील अभय पत्की यांनी न्यायालयाला दिली. एका १४ वर्षीय मुलीने तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगत, राज्य सरकारकडे अर्थसाह्याची मागणी केली. मात्र, राज्य सरकारने तिची या संबंधांना संमती असल्याचे म्हणत, तिला सुरुवातीला अर्थसाह्य देण्यास नकार दिला. मात्र, तिने न्यायालयात याचिका दाखल करताच, सरकारने तिला दोन लाख रुपये अर्थसाह्य म्हणून दिले. तर न्यायालयाने याबाबत राज्य सरकारला धारेवर धरताना, ही योजना अपमान करणारी असल्याचे म्हटले होते. (प्रतिनिधी)