शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

By admin | Updated: April 8, 2017 05:09 IST

आजपर्यंत विधिमंडळात अनेक संघर्षाचे प्रसंग घडले मात्र विरोधी पक्षाने कधीही राष्ट्रगीतावर बहिष्कार घातला नव्हता.

मुंबई : आजपर्यंत विधिमंडळात अनेक संघर्षाचे प्रसंग घडले मात्र विरोधी पक्षाने कधीही राष्ट्रगीतावर बहिष्कार घातला नव्हता. आज कामकाज संस्थगित होताना विरोधी पक्षाने राष्ट्रगीतावरही बहिष्कार घातला. निवडणुकांत सातत्याने झालेल्या पराभवांमुळे विरोधी पक्ष खचून गेला आहे. म्हणूनच त्यांनी ही बहिष्काराची पळवाट शोधून काढली, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांचा समाचार घेतला. विरोधी पक्षाने खरे तर कामकाजात सहभाग घेऊन चर्चा करायला हवी होती, असेही ते म्हणाले. राज्याच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी सर्वाधिक भांडवली गुंतवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्याला ८ हजार कोटी रूपयांची थेट मदत करण्यात आली आहे. कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला निश्चित दिलासा देण्यात येणार आहे. त्याचसोबत जे १ कोटी शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांनाही मदत करण्यात येईल. राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.विकासनिधीचे समान वाटप झाले पाहिजे, ही आपली भूमिका आहे. शिवसेनेच्या आमदारांनाही समान निधी वाटप करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. प्रामाणिक पत्रकाराला संरक्षण मिळावे, ही आपली भूमिका आहे. त्यासाठीच पत्रकार हल्लाविरोधी विधेयक संमत करण्यात आले आहे. मात्र एका बाजूला प्रामाणिक पत्रकाराला संरक्षण देताना कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)>खडसे नाराज नाहीतमाजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे स्वपक्षाच्या मंत्र्यांवरच टीका करत असल्याचा प्रश्न केला असता, एकनाथ खडसे हे अजिबात नाराज नाहीत. लोकप्रतिनिधीला जेव्हा जनतेच्या एखाद्या प्रश्नाबाबत सात्विक संताप निर्माण होतो, तेव्हा तो व्यक्त होतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.सेनेचा आरोप हास्यास्पदनिवडणुकांमध्ये भाजपाने ५० हजार कोटी रुपये वापरले, हा शिवसेना खा. संजय राऊत यांचा आरोप हास्यास्पद आहे. संजय राऊत यांच्या आरोपांना आपण फार महत्त्व देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.