शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कर्जत-कल्याण मार्गावर खड्डे भरण्यास सुरुवात

By admin | Updated: January 19, 2017 03:28 IST

कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत.

नेरळ : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत. या संदर्भात डिकसळ ग्रामस्थांनी अनेक वेळा बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणूनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. या संदर्भात ‘लोकमत’ ने १७ जानेवारी रोजी ‘कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अपघातात वाढ’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत बांधकाम विभागाने या रस्त्यावर डांबराने खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण राज्यमार्गावरील डिकसळजवळील एका हॉटेलजवळ असलेला गतिरोधक आणि खोल खड्डा यामुळे येथे पाच अपघात घडले आहेत. गेल्या दोन महिन्यांत येथे दोन चारचाकी आणि दोन दुचाकीला अपघात घडला असून अनेक जण जखमी झाले. असे असताना अनेक वेळा बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रार केली. परंतु या जागेची पाहणी देखील करण्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळाला नव्हता. या रस्त्यावर चार महिन्यांत अनेकवेळा खड्डे भरले परंतु काही दिवसातच या रस्त्यांची अवस्था पुन्हा खड्डेमय होते. त्यामुळे या रस्त्यावर प्रवासी व वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी याच ररस्त्यावरील कर्जत रेल्वे पुलावर दोन दुचाकीमध्ये अपघात घडला असून एक तरु ण मृत पावला आहे. असे अनेक अपघात घडत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपघातानंतर अशा अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी ते करत आहेत. तसेच याच कर्जत - कल्याण मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पाहायला मिळत आहेत. याच रस्त्यावर नेरळ जिते गावाजवळ पावसाळ्यात दरड कोसळल्याने दगडे रस्त्याच्या कडेला आले आहेत, त्यांचीही पाहणी करून ते लवकर उचलण्यात यावेत व त्या भागात डांबराने खड्डे भरावे, अशी मागणी देखील वाहनचालकांकडून होत आहे.>कर्जत-कल्याण राज्य मार्गावर पाच अपघात घडल्यानंतर बांधकाम विभागाला जाग आली आहे. त्यानंतर या मार्गावर बांधकाम विभागाने डांबराने खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. परंतु हे खड्डे चांगल्या दर्जाचे भरावेत. जर हे खड्डे लगेचच उखडले तर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल. - किशोर गायकवाड,स्थानिक ग्रामस्थ, डिकसळ