शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

नवीन पुलाचे काम लवकर सुरु करा

By admin | Updated: October 3, 2016 03:42 IST

नवीन वाहतुक पुलाचे काम लवकर सुरु करा, अशी मागणी स्थानिक नगरसेविका दक्षता ठाकूर यांनी भारतीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) निवेदनाद्वारे केली

भाईंदर : वरसावे येथील ४३ वर्षे जुना पुल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक ठरल्याने नियोजित नवीन वाहतुक पुलाचे काम लवकर सुरु करा, अशी मागणी स्थानिक नगरसेविका दक्षता ठाकूर यांनी भारतीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी समाजसेवक राजेंद्र ठाकूर, एनएचएआयचे प्रभारी व्यवस्थापक दिनेश अग्रवाल उपस्थित होते. सध्या असलेला ४३ वर्षे जुना पुल सततच्या दुरुस्तीकरीता वाहतुकीसाठी बंद ठेवत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यातच हा पुल उल्हासनदीवर असल्याने पुलाच्या एका बाजुकडील चाकरमान्यांना नोकरीसाठी तर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुलाचाच पर्याय आहे. त्यातच दुरुस्तीसाठी पुल बंद झाल्यास पुलावरुन ये-जा करणे धोकादायक ठरत आहे. नवीन पुलावरील अवजड वाहतुकीमुळे पुलाला हादरे बसत असल्याने चालणाऱ्यांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागते. सध्या पुलाची तिसऱ्यांदा दुरुस्ती होत असून महिनाभरापासुन या पुलांच्या दुतर्फा प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजुंकडील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाला पर्याय म्हणुन एनएचएआयने केंद्र सरकारच्या मंजुरीनुसार नवीन पुलाची प्रक्रीया सुरु केली आहे. अलिकडेच त्याची निविदा प्रक्रीयादेखील पुर्ण करण्यात आल्याचे एनएचएआयच्या सुत्रांकडुन सांगण्यात आले आहे. यावरुन नवीन पुलाच्या निर्मितीचे सोपस्कार पार पडल्याने सततची वाहतुक कोंडी व अस्तित्वातील पुलाच्या दुरुस्तीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी त्याच्या कामाला लवकर सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)