शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

प्रचाराची धुळवड सुरू

By admin | Updated: February 5, 2017 04:17 IST

महापालिकेच्या जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपली असून, जिल्हा परिषदेसाठीची तारीख एक दिवसावर आली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची किती जिल्ह्यांमध्ये आघाडी झाली

- अतुल कुलकर्णी, मुंबईमहापालिकेच्या जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपली असून, जिल्हा परिषदेसाठीची तारीख एक दिवसावर आली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची किती जिल्ह्यांमध्ये आघाडी झाली, याची माहिती दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे नाही, तर शिवसेनेशी असलेली युती तुटल्याने भाजपाला बंडोबांनी घेरले आहे. अशा स्थितीतच प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवातला असून, जणू आतापासूनच शिमगाच सुरू झाला आहे. सारेच पक्ष एकमेकांवर जोरात तुटून पडणार असल्याने, होळीपूर्वीच राज्यात धुळवड पाहायला मिळणार आहे. प्रचाराची राळ अशी उडेल की, सर्वांच्या अंगावरच डाग पडतील. राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांनी मुंबईत मानखुर्दमधून, तर शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांनी गिरगावातून आज प्रचाराला सुरुवात केली. गिरगावच्या सभेतही ठाकरे यांनी मुंबईवर भगवा फडकेल, त्यावर कोणत्याही पक्षाचा डाग नसेल, असा दावा केला.भाजपाची प्रचाराची सगळी भिस्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी या मंत्र्यांनाही भाजपा प्रचारात उतरवणार आहे, तर पूनम महाजन यांच्यावर तरुणांना एकत्र करण्याची जबाबदारी आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि उस्मानाबादेतून प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसतर्फे अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे राज्यभर सभा घेतील. मात्र मुंबईत गुरुदास कामत, कृपाशंकर सिंह, नसीमखान, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त हे प्रचारापासून दूर राहणार असून, नारायण राणे व नसीम खान यांनी मुंबईत प्रचारच करणार नाही असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीतर्फे शरद पवार, अजित पवार राज्यात, जयंत पाटील आदी नेते प्रचार करतील. शिवसेनेने आपले मंत्री, आमदार तसेच संपर्कप्रमुखांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या असून, विदर्भ वगळता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. सेना-राष्ट्रवादीच्या प्रचाराचे नारळ फुटलेमुंबई महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असतानाच शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मानखुर्द येथे झालेल्या सभेत विरोधकांवर तोफ डागत राजकीय फटकेबाजी केली.तर गिरगाव येथे झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तोफ डागत ही अस्तित्त्वाची लढाई असल्याचे भाष्य केले. विशेषत: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच सभेत विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याचे भाष्य केले. - वृत्त/२आरोपांची जुगलबंदी सुरू... काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ रविवारी अशोक चव्हाण फोडणार आहेत. उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोपांची जुगलबंदी सुरूच झाली असून, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे लक्ष्य नेमके हेच दोन पक्ष आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तर चारही पक्षांना टार्गेट लक्ष्य केले आहे.गुपचूप फॉर्मचे वाटपप्रत्येक नेता आपण जिल्ह्याचे मालक आहोत, अशा थाटात वावरत असल्याने, आम्ही पक्षाचे नेते आहोत की कारकून आहोत? असा प्रश्न आम्हाला पडल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवले, तर भाजपाच्या विवेकानंद गुप्ता या पदाधिकाऱ्याने उमेदवारांची यादी परस्पर जाहीर केली. शेवटी भाजपाला मध्यरात्री २ वाजता यादी जाहीर करावी लागली. शिवसेनेलाही उमेदवारांना गुपचूप बोलावून एबी फॉर्म गुपचूप देण्याची वेळ आली.