शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

तारांकित हॉटेल उद्योगाचे ब्रँड इंडिया!

By admin | Updated: September 20, 2016 05:07 IST

देशातील एकूण एक ते पंच तारांकित हॉटेलमध्ये या घडीला सुमारे १ लाख २० हजार खोल्यांची क्षमता आहे.

मुंबई : देशातील एकूण एक ते पंच तारांकित हॉटेलमध्ये या घडीला सुमारे १ लाख २० हजार खोल्यांची क्षमता आहे. मात्र पुढील चार वर्षांत त्यात १ लाख ८० हजार नव्या अतिरिक्त खोल्यांची भर घालण्यासाठी हॉटेल उद्योगाने ‘ब्रँड इंडिया’ची हाक दिली आहे. या घोषणेअंतर्गंत २०२० सालापर्यंत देशात येणाऱ्या १ कोटी पर्यटकांसाठी एकूण ३ लाख खोल्या उपलब्ध असतील.या उपक्रमामध्ये शासनाने पायाभूत सुविधा उभारून हातभार लावावा, असे आवाहन फेडरेशन आॅफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स आॅफ इंडिया (एफएचआरएआय) या हॉटेल जगतातील शिखर संघटनेने केले आहे. एफएचआरएआयचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील इंदूर येथे २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘ब्रँड इंडिया’ संकल्पनेवर कन्व्हेन्शन पार पडेल. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांची प्रमुख उपस्थिती असेल. याशिवाय देशातील ५००हून अधिक हॉटेल व्यावसायिकांचे मालक भाग घेतील. पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सरकारी प्रयत्न वाढवून उत्पादने आणि सेवांमध्ये ब्रँड इंडिया वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, असेही मलकानी यांनी सांगितले.ब्रँड इंडियामार्फत पर्यटन अधिकारी, योजनाकर्ते, गुंतवणूकदार यांना एकाच मंचावर विचारविनिमयासाठी आमंत्रित केले आहे. ही घोषणा पूर्ण करण्यासाठी हॉटेल जगताने ब्रँड इंडियांतर्गत २ लाख कोटी उभारण्याचा संकल्प केला आहे. इंदोरमध्ये पार पडणाऱ्या या ब्रँड इंडियाच्या कन्व्हेन्शनमध्ये हॉटेल उद्योगासाठी आर्थिक उभारणी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक महसूल निर्माण करणे, मोबाइल वॉलेट्स तंत्रज्ञानाच्या वापराने डिजिटल मार्केटिंग, सजावटींतील नवीन ट्रेंड्स यांचा समावेश असेल. कन्व्हेन्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ टीज म्हणजेच टॅलेंट, ट्रॅडिशन, टुरिझम, ट्रेड आणि टेक्नॉलॉजी यांवर भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)>ब्रँड इंडियाचा फायदा काय? ब्रँड इंडियाच्या माध्यमातून देशातील अ‍ॅडव्हेंचर, वेलनेस, स्पोटर््स, इको टुरिझम, फिल्म, ग्रामीण आणि धार्मिक तसेच अन्य उत्पादनांचा प्रसार केला जाईल.शेकडो व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची संधी मिळेल.या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात हॉटेल उद्योगाचे जाळे विणले जाईल. शिवाय लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक देशात आकर्षित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे परकीय चलनही मिळेल.