शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

तारांकित हॉटेल उद्योगाचे ब्रँड इंडिया!

By admin | Updated: September 20, 2016 05:07 IST

देशातील एकूण एक ते पंच तारांकित हॉटेलमध्ये या घडीला सुमारे १ लाख २० हजार खोल्यांची क्षमता आहे.

मुंबई : देशातील एकूण एक ते पंच तारांकित हॉटेलमध्ये या घडीला सुमारे १ लाख २० हजार खोल्यांची क्षमता आहे. मात्र पुढील चार वर्षांत त्यात १ लाख ८० हजार नव्या अतिरिक्त खोल्यांची भर घालण्यासाठी हॉटेल उद्योगाने ‘ब्रँड इंडिया’ची हाक दिली आहे. या घोषणेअंतर्गंत २०२० सालापर्यंत देशात येणाऱ्या १ कोटी पर्यटकांसाठी एकूण ३ लाख खोल्या उपलब्ध असतील.या उपक्रमामध्ये शासनाने पायाभूत सुविधा उभारून हातभार लावावा, असे आवाहन फेडरेशन आॅफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स आॅफ इंडिया (एफएचआरएआय) या हॉटेल जगतातील शिखर संघटनेने केले आहे. एफएचआरएआयचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील इंदूर येथे २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘ब्रँड इंडिया’ संकल्पनेवर कन्व्हेन्शन पार पडेल. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांची प्रमुख उपस्थिती असेल. याशिवाय देशातील ५००हून अधिक हॉटेल व्यावसायिकांचे मालक भाग घेतील. पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सरकारी प्रयत्न वाढवून उत्पादने आणि सेवांमध्ये ब्रँड इंडिया वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, असेही मलकानी यांनी सांगितले.ब्रँड इंडियामार्फत पर्यटन अधिकारी, योजनाकर्ते, गुंतवणूकदार यांना एकाच मंचावर विचारविनिमयासाठी आमंत्रित केले आहे. ही घोषणा पूर्ण करण्यासाठी हॉटेल जगताने ब्रँड इंडियांतर्गत २ लाख कोटी उभारण्याचा संकल्प केला आहे. इंदोरमध्ये पार पडणाऱ्या या ब्रँड इंडियाच्या कन्व्हेन्शनमध्ये हॉटेल उद्योगासाठी आर्थिक उभारणी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक महसूल निर्माण करणे, मोबाइल वॉलेट्स तंत्रज्ञानाच्या वापराने डिजिटल मार्केटिंग, सजावटींतील नवीन ट्रेंड्स यांचा समावेश असेल. कन्व्हेन्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ टीज म्हणजेच टॅलेंट, ट्रॅडिशन, टुरिझम, ट्रेड आणि टेक्नॉलॉजी यांवर भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)>ब्रँड इंडियाचा फायदा काय? ब्रँड इंडियाच्या माध्यमातून देशातील अ‍ॅडव्हेंचर, वेलनेस, स्पोटर््स, इको टुरिझम, फिल्म, ग्रामीण आणि धार्मिक तसेच अन्य उत्पादनांचा प्रसार केला जाईल.शेकडो व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची संधी मिळेल.या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात हॉटेल उद्योगाचे जाळे विणले जाईल. शिवाय लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक देशात आकर्षित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे परकीय चलनही मिळेल.