शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

वाद न घालता जवानांच्या पाठीशी उभे राहा

By admin | Updated: October 12, 2016 07:00 IST

पाकिस्तानी कलावंतांना बॉलीवूडमध्ये स्थान द्यावे की देऊ नये, यावर वाद घालण्याची ही वेळ नसून सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय जवानांच्या मागे एकजुटीने उभे

मुंबई : पाकिस्तानी कलावंतांना बॉलीवूडमध्ये स्थान द्यावे की देऊ नये, यावर वाद घालण्याची ही वेळ नसून सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय जवानांच्या मागे एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले.उरी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये स्थान द्यावे की देऊ नये, या मुद्द्यावर भारतीय कलाकारांचे दोन गट पडले आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण, नाना पाटेकर आदी अभिनेत्यांनी पाकिस्तानी कलाकारांना विरोध; तर ओम पुरी, सलमान खान, करण जोहर, राधिका आपटे आदींनी त्यांची पाठराखण केली आहे. याबाबत अनेक दिवस मौन बाळगून असणाऱ्या सुपरस्टार, ‘बिग बी’ बच्चन यांनी या वादात थेट उडी घेण्याचे टाळले. आपला ७४वा वाढदिवस मंगळवारी कुटुंबीय आणि आप्तेष्टांसोबत साजरा केल्यानंतर ‘बिग बीं’नी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्काराबाबत भूमिका विचारण्यात आली असता अमिताभ यांनी, हात जोडून विनंती करीत असे प्रश्न विचारण्याची ही वेळ नसल्याचे सांगितले. ‘कुणी, कुठे आणि काय म्हणाले, यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. देशावर संकट आहे आणि सीमेवर घडणाऱ्या घटनांमुळे देशातील नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत,’ असे त्यांनी नमूद केले. तसेच आपण सर्वच कलाकारांचा आदर करतो, मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या जिवाचे मोल देणाऱ्या भारतीय जवानांमागे एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. उरी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते गाणे गाणार असल्याच्या वृत्ताचा अमिताभ यांनी इन्कार केला. ‘एका खासदाराने मी गायिलेल्या हनुमान चालिसा आणि गणपती आरतीचे कौतुक केले. तसेच मी उरीतील हुतात्म्यांसाठी गावे असे सुचविले. मी तयारी दर्शविली, मात्र अद्याप त्याबाबत काहीही ठोस ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)