शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

एसटी कामगार संपावर?

By admin | Updated: December 13, 2015 01:08 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के पगारवाढीचा निर्णय येत्या १७ डिसेंबरपर्यंत न घेतल्यास त्याच दिवसापासून एसटी कामगार संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के पगारवाढीचा निर्णय येत्या १७ डिसेंबरपर्यंत न घेतल्यास त्याच दिवसापासून एसटी कामगार संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला. या संपात कामगारांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार हे शासकीय व इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहेत. वाढती महागाई, कौटुंबिक अडचणी, गृहकर्ज, वैद्यकीय खर्च, पाल्यांचे शिक्षण, आदीमुळे ते कर्जबाजारी झाले आहेत. आंध्र-तेलंगणामध्ये तेथील एसटी कर्मचाऱ्यांना ४४ टक्के पगारवाढ दिली आहे. परंतु महाराष्ट्रातीलच एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय का, असा सवालही त्यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही पाचवा, सहावा वेतन आयोग लागू झालेला नाही. त्यातही मान्यताप्राप्त संघटनेने दिलेली आश्वासनेही अद्याप पूर्ण केलेली नाहीत. एसएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ मिळविण्यासाठी इंटकच्या वतीने वेळोवेळी एसटी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आगारपातळीपर्यंत व विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले आहे. परंतु, अद्यापही एसटी प्रशासन अथवा शासनाकडून लक्ष दिले गेलेले नाही. २०१२-२०१६ कामगार करार रद्द करून २०१२-२०१६ या कालावधीकरिता २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यासंदर्भात राज्यभरातून ५३ हजार ५०३ कर्मचाऱ्यांनी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना पत्रही दिले आहे. परंतु, अद्यापही त्यावर तोडगा काढण्यात न आल्याने हे संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.