शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

एसटी २५ नवीन एसी बसेस घेणार

By admin | Updated: June 2, 2014 06:43 IST

येत्या काही महिन्यांत २५ नवीन एसी बसेस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या एसी बसेसची दुरवस्था झालेली असताना आणि त्यात सुधारणा न करताच प्रवाशांच्या दिमतीला दिल्या जात असतानाच येत्या काही महिन्यांत २५ नवीन एसी बसेस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटी महामंडळाने रविवारी ६६ वा वर्धापन दिन साजरा केला. या वर्धापन दिनानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. एसटीच्या ताफ्यात सध्याच्या घडीला ११0 एसी बसेस आहेत. यातील २५ बसेसची तीन वर्षांची मुदत असून, ती कधीच संपली आहे. या बसचे कंत्राट ज्यांच्याकडे आहे, त्या कंत्राटदारांना त्यांचे कंत्राट वाढवून मिळत नव्हते. त्यामुळे त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत या २५ बसेस वार्‍यावर सोडण्याचे काम कंत्राटदारांकडून करण्यात आले आणि या बसेसची अवस्था खूपच बिकट झाली. या बसमध्ये दुरुस्ती आणि बदल करून त्या पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेत त्याच कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महामंडळाकडून याव्यतिरिक्त १0 नवीन एसी बसेस घेतल्या जाणार होत्या. हा निर्णयही मागे पडला. रविवारी एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे, एसटी व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेले व्ही. एन. मोरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसी व्होल्वो बसची स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येते. मात्र आम्ही याचा आढावा घेतला असून, त्यात सुधारणा केल्या आहेत. तसेच ज्या कंत्राटदारांकडे या बसेसचे काम आहे त्यांनाही तशा सूचना केल्या आहेत. हे सांगतानाच राज्य शासनाकडून थकबाकी मिळाल्यास येत्या काही महिन्यांत आणखी २५ नवीन एसी बसेस विकत घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र या बसेस कधी ताफ्यात येतील, हे काहीच सांगू शकले नाहीत. सध्या ताफ्यात असलेल्या एसी बसचे कंत्राट हे एक वर्ष आणखी वाढवल्याने नवीन एसी बसेसची घोषणा ही फक्त घोषणाच राहील की त्याची अंमलबजावणी होईल, हे पाहण्यासारखे असेल. प्रसारमाध्यमे टार्गेट एसटीच्या वर्धापन दिनात या वेळी प्रसारमाध्यमांना एसटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडून टार्गेट करण्यात आले. परदेश दौरा, एसी बसेसची नादुरुस्ती याबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्याने आपला रोष या वेळी पत्रकारांवर काढण्यात आला. तब्बल दीड तास चाललेल्या कार्यक्रमात आणि त्यानंतर एक तास झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांवर फक्त टीकाच करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पत्रकारांना बोलावून त्यांच्यावर टीका करण्यात आल्याने पत्रकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.