शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

एसटीची विनाअपघात सुरक्षितता मोहीम

By admin | Updated: January 5, 2015 04:46 IST

सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विनाअपघात सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे.

ठाणे : सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विनाअपघात सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे. येत्या १० जानेवारीपर्यंत एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयातर्फे जिल्ह्यातील आठही आगारांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास निर्माण करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट अहे. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी आखून दिलेली कार्यपद्धती पाळून अपघात होणार नाही याची दक्षता घेणे, या उद्देशाने दरवर्षी ही मोहीम राबविण्यात येते. महामंडळातर्फे चालकांचे प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी अशा विविध योजना राबविल्या जातात. त्याचप्रमाणे अपघातविरहित सेवेला प्रोत्साहन मिळावे म्हणून चालकांना रोख बक्षिसे, पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि सुरक्षित सेवांचे बिल्ले देऊन सन्मानित केले जाते. चालकांसाठी अत्याधुनिक स्वयंचलित चाचणी मार्ग तयार करण्यात आला असून, त्यावर वाहनचालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. शून्य अपघात मोहीम ही कायमस्वरूपी राबविण्यात येत असते. परंतु, जनजागृतीच्या कालावधीत या मोहिमेला विशेष महत्त्व देण्यात येते, असे एसटीचे ठाणे विभागीय वाहतूक अधिकारी एस.बी. चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एखाद्या अपघातानंतर जीवितहानी झाल्यास त्याची किंमत पैशांत मोजता येत नाही. विनाअपघात सेवा देण्यासाठी मद्यपान करणारे तसेच बेदरकारपणे गाडी चालविणारे यांचाही गस्ती पथकांद्वारे शोध सुरू असल्याचेही एसटीच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)