शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची विनाअपघात सुरक्षितता मोहीम

By admin | Updated: January 5, 2015 04:46 IST

सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विनाअपघात सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे.

ठाणे : सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विनाअपघात सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे. येत्या १० जानेवारीपर्यंत एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयातर्फे जिल्ह्यातील आठही आगारांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास निर्माण करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट अहे. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी आखून दिलेली कार्यपद्धती पाळून अपघात होणार नाही याची दक्षता घेणे, या उद्देशाने दरवर्षी ही मोहीम राबविण्यात येते. महामंडळातर्फे चालकांचे प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी अशा विविध योजना राबविल्या जातात. त्याचप्रमाणे अपघातविरहित सेवेला प्रोत्साहन मिळावे म्हणून चालकांना रोख बक्षिसे, पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि सुरक्षित सेवांचे बिल्ले देऊन सन्मानित केले जाते. चालकांसाठी अत्याधुनिक स्वयंचलित चाचणी मार्ग तयार करण्यात आला असून, त्यावर वाहनचालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. शून्य अपघात मोहीम ही कायमस्वरूपी राबविण्यात येत असते. परंतु, जनजागृतीच्या कालावधीत या मोहिमेला विशेष महत्त्व देण्यात येते, असे एसटीचे ठाणे विभागीय वाहतूक अधिकारी एस.बी. चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एखाद्या अपघातानंतर जीवितहानी झाल्यास त्याची किंमत पैशांत मोजता येत नाही. विनाअपघात सेवा देण्यासाठी मद्यपान करणारे तसेच बेदरकारपणे गाडी चालविणारे यांचाही गस्ती पथकांद्वारे शोध सुरू असल्याचेही एसटीच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)