शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खड्ड्यांमुळे एसटी खिळखिळी

By admin | Updated: November 10, 2014 04:22 IST

ठाणे ते नाशिक या दरम्यानच्या महामार्गावर खड्ड्यांचा कहर झाला आहे. टोल कंत्राटदार त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात चालढकल करत आहे

ठाणे : ठाणे ते नाशिक या दरम्यानच्या महामार्गावर खड्ड्यांचा कहर झाला आहे. टोल कंत्राटदार त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात चालढकल करत आहे. त्यामुळे या मार्गावरून रोज धावणाऱ्या जवळपास अडीचशे बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. बस बिघडण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. एकीकडे हे संकट आणि दुसरीकडे आवश्यक त्या सुट्या भागांची तातडीने न होणारी खरेदी यामुळे एसटी कचाट्यात सापडली आहे.या महामार्गावर मुलुंड टोलनाका, खारीगाव टोलनाका, पडघा टोलनाका आणि घोटी टोलनाका अशा चार ठिकाणी टोल वसूल होतो. मुंबई व ठाणे शहरांतला महामार्ग उत्तम आहे. परंतु, ठाणे ते नाशिक दरम्यानच्या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांची दुरुस्ती आणि बांधणी पेव्हर ब्लॉकने करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ९ इंच ते १ फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. त्यांची दुरुस्ती टोल ठेकेदार करीत नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पुरेशा गतीने प्रवासही करता येत नाही. खड्ड्यांमुळे वाहनांचे पाटे आणि अ‍ॅक्सल यांची हानी मोठ्या प्रमाणावर होते आहे. खड्ड्यांमुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे वेगवेगळे सुटे भाग जोडणारे नट आणि बोल्ट सैल होऊन त्यातून वेगळेच दुखणे ओढवते आहे.ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात टोल मिळतो, तरीही खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवासी आणि चालक यांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास वेगळाच आहे. खासगी वाहनांची होणारी झीज आणि ती बंद पडणे, या त्रासातही सध्या प्रचंड भर पडली आहे. शपथविधी आणि मंत्रिपदांचे वाटप यात गुंतलेल्या नव्या सरकारला या महत्त्वाच्या मुद्द्याकडे बघायला वेळ नाही. सतत हादरे बसून प्रवाशांना पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे एसटीची आणि वाहनचालकांची अवस्था ‘असून नाथ आम्ही अनाथ’ अशी झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)