शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचारी निलंबित होण्याचे प्रमाण घटणार!

By admin | Updated: April 28, 2016 05:12 IST

राज्य परिवहन महामंडळाचे दरवर्षी ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी एक तर निलंबित होतात

डिप्पी वांकाणी,

मुंबई- राज्य परिवहन महामंडळाचे दरवर्षी ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी एक तर निलंबित होतात किंवा त्यांची चौकशी सुरू असल्यामुळे निर्माण झालेली मनुष्यबळाची टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना होत आहे. काही गुन्हे हे सौम्य (कंपाउंडेबल) करण्यात आले असून, चालक आणि वाहक यांचे निलंबन त्यांच्याकडून तसाच गुन्हा तिसऱ्या वेळेस झाला तरच केले जाईल, असा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे पाठविला असून, शासनाच्या निर्णयाची महामंडळाला प्रतीक्षा आहे. पैसे घेऊनही तिकीट न दिल्यास वाहकाला त्या तिकिटाच्या ५०० पट दंड ठोठावला जाईल, भाडे न आकारता सामानाची वाहतूक करणे (विशेषत: चालकाच्या केबिनमधून दहशतवादी दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक केली जाण्याची मोठी शक्यता असते) या गुन्ह्यांची तीव्रता कमी केली जाणार नाही.‘दरवर्षी ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी वर्ग निलंबित राहात असेल, तर ते कोणत्याही संघटनेच्या आरोग्याच्या हिताचे नाही. त्यामुळे आम्ही गेल्या मार्च महिन्यामध्ये काही गुन्हे हे कमी गंभीर बनविले असून, अपराध्यांना तेथल्या तेथे दंड ठोठावला जाईल, असा प्रस्ताव तयार केला आहे. मोठ्या प्रमाणावरील दंडाची रक्कम बघून कर्मचाऱ्यांना पुन्हा तोच गुन्हा करण्यापासून रोखता येईल आणि कर्मचारी निलंबित झाल्यानंतर विभागीय चौकशीच्या प्रक्रियेत महामंडळाच्या होणाऱ्या मोठ्या खर्चातही बचत होईल,’ असे पोलीस महानिरीक्षक विनीत अग्रवाल यांनी सांगितले.राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी म्हणून अग्रवाल यांची सध्या नियुक्ती करण्यात आली आहे. अग्रवाल भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असून, आयआयटीतून (दिल्ली) त्यांनी एमबीए पूर्ण केले आहे. ते म्हणाले, ‘प्रस्ताव अमलबजावणीच्या शेवटच्या पायरीवर आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यालयाला प्रस्ताव पाठविण्यात आला असून, त्यांच्याकडून लवकरच प्रतिसाद मिळेल.’आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी संघटनेचे सदस्य आणि महामंडळाचे अधिकारी यांची टोळी निलंबित अधिकाऱ्यांना मदतीच्या नावाखाली भरपूर कमाई करीत असते. ‘एकदा कर्मचारी निलंबित झाला की, संघटनेच्या काही सदस्यांना त्याच्याकडून पार्टी द्यावी लागते. या सदस्यांचे महामंडळात वेगवेगळ््या स्तरावर ‘सहकारी’ असतात. अशा अनेक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि लाच देऊन निलंबित कर्मचारी चौकशीतून ‘निर्दोष’ असल्याचे प्रमाणपत्र मिळवतो, शिवाय हा निलंबित कर्मचारी चौकशीला हजर राहायचे म्हणून रजा घेतो, त्यामुळेही महामंडळाचा आणखी तोटा होतो,’ असे हा अधिकारी म्हणाला.‘दक्षता विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबित कर्मचाऱ्यांकडून लाच घेताना लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. प्रस्तावातील व्यवस्था एकदा अमलात आल्यास महामंडळाचा खूप मोठा वेळ आणि पैसा वाचेल,’ असे विनीत अग्रवाल म्हणाले.>हे गंभीर गुन्हे सौम्य करण्यात आले नाहीत.तिकिटाची फेरविक्री, भाडे न आकारता सामान वाहून नेणे, अंतराच्या निश्चित भाड्याऐवजी कमी किमतीचे तिकीट देणे>अशी असेल ‘शिक्षा’पैसे घेतले, पण तिकीट दिले नाही, म्हणून दंड-तिकिटाच्या किमतीच्या ५०० पट किंवा १० हजार रुपये (जे जास्त असेल ते).पुन्हा हाच गुन्हा केल्यास तिकिटाच्या किमतीच्या ७५० पट दंड किंवा १५ हजार रुपये (जे जास्त असेल ते).तिसऱ्यांदा हाच गुन्हा घडल्यास - निलंबनतिकीट न देणे किंवा विनातिकीट प्रवास करू देणेतिकिटाच्या किमतीच्या ५० पट किंवा एक हजार रुपये (जे जास्त असेल ते).दिलेल्या तिकिटांपेक्षा कमी पैसे जवळ आढळल्यास - तिकिटाच्या किमतीच्या १०० पट किंवा एक हजार रुपये (जे जास्त असेल ते).बसमध्ये गर्दी नाही आणि सगळे प्रवासी बसले असूनही तिकीट दिलेले नाही - पहिल्यांदा तिकिटाच्या किमतीच्या १०० पट किंवा दोन हजार रुपये (जे जास्त असेल ते).दुसऱ्यांदा तोच गुन्हा घडल्यास - तिकिटाच्या किमतीच्या २०० पट किंवा पाच हजार रुपये (जे जास्त असेल ते).तिसऱ्यांदा हाच गुन्हा घडल्यास - निलंबन