शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एस.टी.चे कर्मचारी करणार ‘खादी’चा प्रचार

By admin | Updated: March 30, 2017 01:29 IST

खादी उद्योगाला प्रोत्साहन : कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालण्याचे महामंडळाचे आवाहन

प्रदीप शिंदे -- कोल्हापूर  -खादी उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सुरू केलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून एस. टी. महामंडळाचे कर्मचारीही आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे वापरणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे एक लाख कर्मचारी खादीचे कपडे वापरून आता खादीचा प्रचार करताना दिसणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा जागर करणारी खादी. सध्याच्या काळात लाखो कारागिरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी सरकारी कार्यालयांत आठवड्यातील एक दिवस कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालून कार्यालयांमध्ये यावे, असे आवाहन गेल्या वर्षी केंद्र सरकारकडून करण्यात आले होते. यानुसार खादीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातील आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांंना आठवड्यातून एकदा तरी खादीचा गणवेश वापरण्याचे आवाहन करणारे परिपत्रक महामंडळाने गेल्याच आठवड्यात काढले आहे. महामंडळाने खादीचे गणवेश वापरण्यासाठी कोणतीही सक्ती केलेली नसून ही पूर्णत: ऐच्छिक बाब आहे. इतर कर्मचाऱ्यांबरोबरच खाकी गणवेश असलेल्या एस.टी.च्या चालक-वाहकांनीदेखील खादीचा किमान एक संच शिवून घ्यावा व आठवड्यातून आपल्या ऐच्छिकतेने परिधान करावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची नाळ ही सर्वसामान्य जनतेपर्यंत थेट पोहोचली असल्याने खादीचा प्रचार व प्रसार या माध्यमातून होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. खादीचे कापड शरीरासाठी उत्तम असते. खादीमुळे उन्हाळ्यात थंडावा, तर हिवाळ्यात उबदारपणा मिळतो. यात रासायनिक द्रव्यांचा कमीत कमी वापर असल्याने ते अपायकारक नसते. या सर्व बाबींमुळे हल्ली खादी घालण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. महामंडळाने जरी एक दिवस खादी घालण्याचे आवाहन केले असले तरी ते ऐच्छिक आहे. या चांगल्या उपक्रमास सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे.- नवनीत भानप,विभाग नियंत्रक, कोल्हापूर ग्रामोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या आणि गावागावांतील कलावंतांच्या हातांना काम देणाऱ्या खादीच्या वापरास चालना मिळणारा हा उपक्रम आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून महत्त्वाच्या ठरलेल्या खादी उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या संघटनेचा पाठिंबाच राहील. - संजीव चिकुर्डेकर, सचिव, एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटना४परिपत्रकाद्वारे महामंडळाचे आवाहन ४आठवड्यातून एक दिवस वापरा खादी ४सक्ती नसून ही पूर्णत: ऐच्छिक बाब