शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बीकेसीमध्ये एसआरए घोटाळा

By admin | Updated: December 3, 2014 04:00 IST

एचडीआयएल कंपनीचे दहा संचालक, तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी आणि मोतीलाल नेहरू नगर गृहनिर्माण संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी यांनाही याप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे

मुुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मोतीलाल नेहरूनगर झोपडपट्टीत राबविण्यात आलेल्या एसआरए योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) विकासक एचडीआयएल कंपनीचे अध्यक्ष राकेशकुमार वाधवान यांच्यासह तत्कालीन एसआरए सीईओ देबाशिष चक्रवर्ती, उज्ज्वल उके यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. एचडीआयएल कंपनीचे दहा संचालक, तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी आणि मोतीलाल नेहरू नगर गृहनिर्माण संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी यांनाही याप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. भ्रष्टाचारासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, त्याचा वापर करून प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवणे, त्यासाठी कट रचणे, शासनाची आर्थिक फसवणूक करणे असे गंभीर गुन्हे या सर्वांविरोधात नोंदविण्यात आले आहेत. बीकेसीतल्या अत्यंत मोक्याच्या भूखंडावर वसलेल्या मोतीलाल नेहरू नगर झोपडपट्टीत २००४मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पात पात्र असूनही अपात्र ठरवून गाळा नाकारण्यात आलेल्या शमीम खान यांनी माहिती अधिकाराचा वापर करून हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणला. एचडीआयएल कंपनीसोबत हातमिळवणी करून एसआरए, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कसा घोटाळा केला हे खान यांनी पुराव्यांसह एसीबीसमोर ठेवले आणि कारवाईची मागणी केली. मात्र एसीबीने कारवाई न केल्याने अखेर खान यांनी विशेष सत्र न्यायालयात खासगी तक्रार केली. तक्रारीची सुनावणी पूर्ण करून न्या. एस. व्ही रणपिसे यांनी याप्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश एसीबीला दिले. त्यानुसार एसीबीने गुन्हा नोंदविला. या सुनावणीत अ‍ॅड. युसूफ खान आणि अ‍ॅड. अंजली अवस्थी यांनी तक्रारदाराच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद केला.  मुळात ज्या भूखंडावर एसआरए प्रकल्प उभा राहिला त्या भूखंडाची मालकी एमएमआरडीएकडे आहे. त्यामुळे या भूखंडावरील नियोजन करण्याचे हक्क एसआरएकडे नसून एमएमआडीएकडे होते. शिवाय हा भूखंड गणनाकृत झोपडपट्टी (सेन्सस्ड स्लम) म्हणून जाहीर झालेला नव्हता. त्यामुळे या भूखंडावर एसआरए प्रकल्प होऊच शकत नव्हता.मात्र २००४मध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्याने हा भुखंड सेन्सस्ड स्लम असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले. त्याच प्रमाणपत्राच्या आधारे तत्कालीन एसआरए सीईओ आणि अन्य अधिकाऱ्यांनी एचडीआयएलला प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या दिल्या. प्रकल्पासाठी ७० टक्के झोपडीधारकांची मंजुरी आवश्यक असते. ही परवानगी मिळविण्यासाठी एचडीआयएल कंपनीने बनावट झोपडीधारक उभे केले. त्यासाठी त्यांनी बोगस रेशन कार्ड आणि लाईट बिले तयार करून घेतली. या रेशनकार्ड किंवा लाईट बिलांची शहानिशा उप किंवा अप्पर जिल्हाधिकारी करतात. त्यासाठी संबंधीत वीज कंपनी किंवा रेशनिंग विभागाकडून अहवाल मागविला जातो. मात्र या प्रकरणात असा कोणताही अहवाल न मागविताच सर्व झोपडीधारक पात्र आहेत असे जाहीर केले. एचडीआयएलने अवैधपणे २.५ एफएसआय मिळवून जास्तीचे बांधकाम केले. उभारलेल्या प्रकल्पातील विक्रीसाठी बांधलेले फ्लॅट विकलेच; पण प्रकल्पग्रस्तांचे फ्लॅटही विकले.