शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

एसपीपीएल कंपनी एसआरए मार्गी लावणार?

By admin | Updated: November 23, 2015 02:12 IST

मुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीने शर्थीचे (एसपीपीएल) प्रयत्न

तेजस वाघमारे,  मुंबईमुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीने शर्थीचे (एसपीपीएल) प्रयत्न सुरू केले आहेत. कंपनी पुनरुज्जीवित करण्यासाठी शासनाने एसआरएकडील निधी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीचा वापर करून कंपनी मुंबईतील प्रलंबित एसआरए प्रकल्प मार्गी लावण्याचा विचार करत आहे, परंतु अद्यापही कंपनीच्या तिजोरीत हा निधी जमा झाला नसल्याने कंपनी या निधीच्या प्रतीक्षेत आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीला पुनरुज्जीवन देण्यासाठी राज्य शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील ५00 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे.एसआरएकडून प्राप्त होणारा निधी मुंबई वगळता इतरत्र वापरता येणार नसल्याने, कंपनी मुंबईतील एसआरए योजना राबविण्याचा विचार करत आहे. एमएमआर क्षेत्रात खासगी विकासक, जमीन मालकांच्या मदतीने घरे उभारण्यासाठी कंपनीने निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये तीन एसआरए संस्थांनी शिवशाही कंपनीने प्रकल्प राबविण्याची मागणी केली आहे. एसआरएच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शिवशाही कंपनीला शासनाकडून ५00 कोटींचा निधी वितरित करण्यात येणार आहे. हा निधी शिवशाहीला मिळाल्यास तो मुंबईतील कामांसाठीच वापरता येणार आहे. एसआरए संस्थांनी पुनर्विकासासाठी प्रस्ताव दिल्याने, या झोपड्यांचा आणि इतर संस्थांचा पुनर्विकास करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे एसपीपीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक देबाशिष चक्रबर्ती यांनी सांगितले.