शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

आत्मसमर्पित नक्षल्यांना घरे देण्याच्या कामाला गती

By admin | Updated: September 3, 2014 01:13 IST

नक्षल चळवळीचा पूर्णत: बिमोड करण्यासाठी शासनाने आणखी पुढाकार घेत आता सुधारीत आत्मसमर्पण योजना सुरु केली आहे. नक्षल चळवळ सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या आत्मसमर्पित

५.५३ हेक्टर जमीन अधिग्रहीत : १७१ भूखंडाचे होणार वितरणगडचिरोली : नक्षल चळवळीचा पूर्णत: बिमोड करण्यासाठी शासनाने आणखी पुढाकार घेत आता सुधारीत आत्मसमर्पण योजना सुरु केली आहे. नक्षल चळवळ सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या आत्मसमर्पित नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. ही चळवळ सोडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. त्यासाठी शासनाने ५.५३ हेक्टर जमीन अधिग्रहीत केली असून आत्मसमर्पीत नक्षल्यांसाठी १७१ भूखंड वितरीत करण्यात येणार आहे. या भूखंडावर शासनाकडून मोफत घरकूल बांधून मिळणार आहे. भूखंडाच्या मोजमापाच्या कामास गती आली आहे.चळवळीत सक्रीय असलेल्या नक्षल्यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन स्वत:चा विकास करावा. तसेच सुखी जीवन जगावे यासाठी शासनाने २९ आॅगस्ट २००५ पासून नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरु केली. या योजनेंतर्गत आत्मसमर्पीतांना ठराविक रक्कम, भूखंड, घरकूल, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड आदी सुविधा देण्यात येत आहे. या व्यापक योजनेकडे नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण करण्याचा कल वाढला आहे. चळवळीतील अनेक नक्षलवादी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पण करीत आहेत. गत वर्षी २०१३ मध्ये सर्वाधिक ४८ नक्षल सदस्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पीत नक्षली हे नेहमीच चळवळीतील नक्षल्यांचे लक्ष्य असतात. नक्षल्यांकडून त्यांना जीवे मारण्याची भीती असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरालगतच आत्मसमर्पित नक्षल्यांचे पुनर्वसन करण्याचे शासनाचे धोरण आहे. याच उद्देशाने गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर परिसरात शासनाने आत्मसमर्पीत नक्षल्यांच्या भूखंडासाठी १६६/१ (३.५३ हेक्टर) व १६७ (२ हेक्टर) क्रमांकाचे दोन मोठे भूखंड अधिग्रहीत केले आहे. जवळपास १४ एकर क्षेत्रफळ असलेल्या या जमिनीवर आत्मसमर्पीत नक्षल्यांना एकूण १७१ भूखंडाचे वाटप होणार आहे. २००५ पासून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना प्रत्येकी १ हजार २५० चौ.फूट क्षेत्रफळाचा भूखंड मोफत मिळणार असून त्यावर इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलसुध्दा बांधून मिळणार आहे. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जमिनीचे मोजमाप करणे सुरु झाले आहे. शासनाने हक्काचा निवारा दिल्यामुळे आत्मसमर्पीत नक्षल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच चळवळीतील इतर नक्षल्यांनीसुध्दा आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलीस व आत्मसमर्पीत नक्षल्यांनीसुध्दा चळवळीत काम करणाऱ्या नक्षलवाद्यांना केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)