शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पित नक्षल्यांना घरे देण्याच्या कामाला गती

By admin | Updated: September 3, 2014 01:13 IST

नक्षल चळवळीचा पूर्णत: बिमोड करण्यासाठी शासनाने आणखी पुढाकार घेत आता सुधारीत आत्मसमर्पण योजना सुरु केली आहे. नक्षल चळवळ सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या आत्मसमर्पित

५.५३ हेक्टर जमीन अधिग्रहीत : १७१ भूखंडाचे होणार वितरणगडचिरोली : नक्षल चळवळीचा पूर्णत: बिमोड करण्यासाठी शासनाने आणखी पुढाकार घेत आता सुधारीत आत्मसमर्पण योजना सुरु केली आहे. नक्षल चळवळ सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या आत्मसमर्पित नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. ही चळवळ सोडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. त्यासाठी शासनाने ५.५३ हेक्टर जमीन अधिग्रहीत केली असून आत्मसमर्पीत नक्षल्यांसाठी १७१ भूखंड वितरीत करण्यात येणार आहे. या भूखंडावर शासनाकडून मोफत घरकूल बांधून मिळणार आहे. भूखंडाच्या मोजमापाच्या कामास गती आली आहे.चळवळीत सक्रीय असलेल्या नक्षल्यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन स्वत:चा विकास करावा. तसेच सुखी जीवन जगावे यासाठी शासनाने २९ आॅगस्ट २००५ पासून नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरु केली. या योजनेंतर्गत आत्मसमर्पीतांना ठराविक रक्कम, भूखंड, घरकूल, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड आदी सुविधा देण्यात येत आहे. या व्यापक योजनेकडे नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण करण्याचा कल वाढला आहे. चळवळीतील अनेक नक्षलवादी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पण करीत आहेत. गत वर्षी २०१३ मध्ये सर्वाधिक ४८ नक्षल सदस्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पीत नक्षली हे नेहमीच चळवळीतील नक्षल्यांचे लक्ष्य असतात. नक्षल्यांकडून त्यांना जीवे मारण्याची भीती असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरालगतच आत्मसमर्पित नक्षल्यांचे पुनर्वसन करण्याचे शासनाचे धोरण आहे. याच उद्देशाने गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर परिसरात शासनाने आत्मसमर्पीत नक्षल्यांच्या भूखंडासाठी १६६/१ (३.५३ हेक्टर) व १६७ (२ हेक्टर) क्रमांकाचे दोन मोठे भूखंड अधिग्रहीत केले आहे. जवळपास १४ एकर क्षेत्रफळ असलेल्या या जमिनीवर आत्मसमर्पीत नक्षल्यांना एकूण १७१ भूखंडाचे वाटप होणार आहे. २००५ पासून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना प्रत्येकी १ हजार २५० चौ.फूट क्षेत्रफळाचा भूखंड मोफत मिळणार असून त्यावर इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलसुध्दा बांधून मिळणार आहे. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जमिनीचे मोजमाप करणे सुरु झाले आहे. शासनाने हक्काचा निवारा दिल्यामुळे आत्मसमर्पीत नक्षल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच चळवळीतील इतर नक्षल्यांनीसुध्दा आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलीस व आत्मसमर्पीत नक्षल्यांनीसुध्दा चळवळीत काम करणाऱ्या नक्षलवाद्यांना केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)