शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

मिहानला गती द्या, वीजप्रश्न सोडवा!

By admin | Updated: June 15, 2014 00:38 IST

मिहान प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रसंगी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन स्थानिकांशी बोलणी करून आणि चर्चेच्या मार्गाने अडचणी सोडविण्याची विनंती केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी

आढावा बैठक : नितीन गडकरी यांची अधिकाऱ्यांना विनंती नागपूर : मिहान प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रसंगी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन स्थानिकांशी बोलणी करून आणि चर्चेच्या मार्गाने अडचणी सोडविण्याची विनंती केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना रविभवन येथे शनिवारी झालेल्या बैठकीत केली. छोट्या समस्या निकाली काढागजराज प्रकल्पाची जमीन, बोर्इंग प्रकल्पाचा टॅक्सी-वे, झुडपी जंगल आणि पुनर्वसनाच्या प्रश्नावर विस्तृत चर्चा झाली. गडकरी यांनी बैठकीत सांगितले की, मिहान हा आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रकल्प असून विदर्भासाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पात मोठे उद्योजक आले तरच या भागाचा विकास होईल आणि युवकांना रोजगार मिळेल. शिवाय चांगला संदेश देशात जाईल. यासाठी कायद्यावर बोट ठेवून प्रत्येक प्रश्न सुटणार नाही. घरांचे पुनर्वसन असो की शेतकऱ्यांना देण्यात येणारा जमिनीचा दर असो, हे प्रश्न चर्चेतूनच सुटणार आहे. प्रसंगी विभागीय स्तरावर जिल्हाधिकारी आणि एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठकी घ्याव्यात. केंद्र स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलणी करू. मिहान प्रकल्पासाठी अनेक वर्षे निघून गेली आहेत. मिहान प्रकल्पाचा विकास झालाच पाहिजे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. प्रारंभी एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या गजराज प्रकल्पाचा २७८ हेक्टर जागेचा मुद्दा उपस्थित केला. २००९ मध्ये एमएडीसीने संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. आता त्यात काही बदल मंत्रालयाकडून मागितले जात आहे. हा प्रश्न सुटावा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय मिहानमधील २०.१३ हेक्टर झुडपी जंगलाचा प्रश्न सुटावा, अशी विनंती अधिकाऱ्यांनी बैठकीत केली. मिहान या जागेच्या बदल्यात ४० हेक्टर जागा वन विभागाला देण्यास तयार आहे. पण वन विभागाला सात बाराच्या उताऱ्यावर वन विभाग, असे लिहून हवे आहे. चिचभुवन येथील पिवळ्या पट्ट्यातील घरांचा प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्याची विनंती गडकरी यांनी केली. वर्धा महामार्गावरील घरांचा प्रश्न सोडविण्यास सांगितले. वीजप्रश्न चर्चेद्वारे सोडवामिहानमधील विजेचा प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. अभिजित समूहातर्फे निर्मित वीज मिहानमधील उद्योजकांना द्यावी आणि उर्वरित वीज महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ठरविलेल्या किमान दराने बाहेर विकण्यास परवानगी द्यावी, असे गडकरी यांनी सुचविले. कारण येथील उद्योजकांना महावितरणची वीज ७ ते ८ रुपये प्रति युनिट दराने मिळणार आहे. ही वीज उद्योजकांना परवडणारी नाही. समूहातर्फे मिळणाऱ्या विजेचा दर ३.५० रुपये पडेल, शिवाय त्यांना ४ ते ५ रुपये बाहेर विकण्यास मुभा द्यावी. जेणेकरून काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विजेच्या प्रश्नावर तोडगा निघेल आणि चांगला संदेश बाहेरच्या उद्योजकांमध्ये जाईल. त्यामुळे मिहानमध्ये गुंतवणूक वाढेल, असे गडकरी यांनी सांगितले.‘टॅक्सी-वे’ला गती द्या‘बोर्इंग एमआरओ’साठी बांधण्यात येणाऱ्या ‘टॅक्सी-वे’ला गती देण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. ‘टॅक्सी-वे’त अडसर ठरलेली बापू डवरे यांची ०.९३ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यासाठी डवरे यांना जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची विनंती केली. हा प्रश्न निकाली निघाल्यास बोर्इंग प्रकल्पाला गती मिळेल.खापरी येथील घरांचे पुनर्वसनम्हाडा जमिनीचे हस्तांतरण व शिवणगावचा प्रश्नखापरी येथील ५९ घरे आणि मिहान प्रकल्पांतर्गत असलेल्या म्हाडाच्या ७० घरांच्या पुनवर्सनाचा प्रश्न चर्चेत आला. यावर आ. चंद्रशेखर बावनकुळे हा प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शविली. म्हाडा येथील रहिवाशांना मिहान बाहेर जागा उपलब्ध करून देण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली. म्हाडाच्या १६ एकर जमिनीच्या बदल्यात केवळ ४ एकर जागा लोकांना द्यावी लागणार आहे. हा प्रश्न प्रलंबित ठेवू नये, अशी विनंती गडकरी यांनी अधिकाऱ्यांना केली. याशिवाय तेल्हारा, कलकुही, दहेगाव, शिवणगाव (गावठाण) येथील घरांच्या प्रश्नावर चर्चा झाली. शिवणगाव येथील रहिवाशांची यादी शासनाने चुकीची तयार केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: गावात जाऊन पाहणी करावी आणि स्थिती जाणून घ्यावी, अशी विनंती गडकरी यांनी केली. बैठकीत जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मनपा आयुक्त श्याम वर्धने, आ. सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकल्पग्रस्तांचे नेते बाबा डवरे, विजय राऊत, बापू डवरे यांच्यासह एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष तानाजी सत्रे, मुख्य अभियंते आर. चहांदे तसेच मनोहर हिकरे, आबीद रुही, अतुल ठाकरे आणि मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर भोजवानी, अभिजित समूहाचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)