शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

केवळ वीस हजारांवर बोळवण

By admin | Updated: August 15, 2015 01:11 IST

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर ठिकाणी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांवर दुष्काळामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. कारखानदार जिथे लाखांत उचल द्यायचे तिथे आता

-  अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई (जि.बीड)महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर ठिकाणी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांवर दुष्काळामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. कारखानदार जिथे लाखांत उचल द्यायचे तिथे आता केवळ १५ ते २० हजारांवर बोळवण होऊ लागली आहे. बैलगाडीद्वारे उसाची वाहतूक करणाऱ्या गाडीवानांना तर यंदा साधे बोलावणेही नाही.ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. अंबाजोगाई व परिसरातून हजारो कामगार ऊसतोडीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातही जातात. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाई व चाऱ्याचाही मोठा प्रश्न आहे. अशा स्थितीत सहा महिने ऊसतोडीसाठी गेल्यास काहीतरी पोटापाण्याला मिळेल, या आशेवर हे कामगार होते.पण या कालावधीत मराठवाडा व परिसरात उसाचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, परिसरातील साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता नाही. साखर कारखान्यांची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात बैलगाडीतूनच होते. बैलजोडीवर पोट असलेल्या कामगारांचेही हाल सुरू आहेत. अद्यापपर्यंत तरी या बैलगाडीवानांना कोणत्या साखर कारखान्याचा निरोप नाही. त्यामुळे कुटुंबाची उपजीविका भागवायची कशी, असा मोठा प्रश्न या कामगारांसमोर आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसह परराज्यातील साखर कारखाने मे महिन्यातच ऊसतोड कामगारांना प्रति कोयता एक ते दीड लाखाची उचल देतात. मात्र, दुष्काळाच्या झळा साखर कारखान्यांसह ऊसतोड कामगारांनाही सोसाव्या लागत आहेत. ज्या कारखान्यांकडून बोलावणे आले त्या कारखान्यांनी १५ ते २० हजार रुपयांवरच कामगारांची बोळवण केली. कमी पैशांमुळे कारखान्यांकडे जाण्याचे टाळले तर इथल्या दुष्काळी स्थितीत उपजीविका भागवायची कशी? ही समस्याही कामगारांना भेडसावणारी आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारही मिळेल ती उचल स्वीकारत आहेत.