शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

केवळ वीस हजारांवर बोळवण

By admin | Updated: August 15, 2015 01:11 IST

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर ठिकाणी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांवर दुष्काळामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. कारखानदार जिथे लाखांत उचल द्यायचे तिथे आता

-  अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई (जि.बीड)महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर ठिकाणी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांवर दुष्काळामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. कारखानदार जिथे लाखांत उचल द्यायचे तिथे आता केवळ १५ ते २० हजारांवर बोळवण होऊ लागली आहे. बैलगाडीद्वारे उसाची वाहतूक करणाऱ्या गाडीवानांना तर यंदा साधे बोलावणेही नाही.ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. अंबाजोगाई व परिसरातून हजारो कामगार ऊसतोडीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातही जातात. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाई व चाऱ्याचाही मोठा प्रश्न आहे. अशा स्थितीत सहा महिने ऊसतोडीसाठी गेल्यास काहीतरी पोटापाण्याला मिळेल, या आशेवर हे कामगार होते.पण या कालावधीत मराठवाडा व परिसरात उसाचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, परिसरातील साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता नाही. साखर कारखान्यांची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात बैलगाडीतूनच होते. बैलजोडीवर पोट असलेल्या कामगारांचेही हाल सुरू आहेत. अद्यापपर्यंत तरी या बैलगाडीवानांना कोणत्या साखर कारखान्याचा निरोप नाही. त्यामुळे कुटुंबाची उपजीविका भागवायची कशी, असा मोठा प्रश्न या कामगारांसमोर आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसह परराज्यातील साखर कारखाने मे महिन्यातच ऊसतोड कामगारांना प्रति कोयता एक ते दीड लाखाची उचल देतात. मात्र, दुष्काळाच्या झळा साखर कारखान्यांसह ऊसतोड कामगारांनाही सोसाव्या लागत आहेत. ज्या कारखान्यांकडून बोलावणे आले त्या कारखान्यांनी १५ ते २० हजार रुपयांवरच कामगारांची बोळवण केली. कमी पैशांमुळे कारखान्यांकडे जाण्याचे टाळले तर इथल्या दुष्काळी स्थितीत उपजीविका भागवायची कशी? ही समस्याही कामगारांना भेडसावणारी आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारही मिळेल ती उचल स्वीकारत आहेत.