शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

केवळ वीस हजारांवर बोळवण

By admin | Updated: August 15, 2015 01:11 IST

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर ठिकाणी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांवर दुष्काळामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. कारखानदार जिथे लाखांत उचल द्यायचे तिथे आता

-  अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई (जि.बीड)महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर ठिकाणी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांवर दुष्काळामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. कारखानदार जिथे लाखांत उचल द्यायचे तिथे आता केवळ १५ ते २० हजारांवर बोळवण होऊ लागली आहे. बैलगाडीद्वारे उसाची वाहतूक करणाऱ्या गाडीवानांना तर यंदा साधे बोलावणेही नाही.ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. अंबाजोगाई व परिसरातून हजारो कामगार ऊसतोडीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातही जातात. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाई व चाऱ्याचाही मोठा प्रश्न आहे. अशा स्थितीत सहा महिने ऊसतोडीसाठी गेल्यास काहीतरी पोटापाण्याला मिळेल, या आशेवर हे कामगार होते.पण या कालावधीत मराठवाडा व परिसरात उसाचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, परिसरातील साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता नाही. साखर कारखान्यांची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात बैलगाडीतूनच होते. बैलजोडीवर पोट असलेल्या कामगारांचेही हाल सुरू आहेत. अद्यापपर्यंत तरी या बैलगाडीवानांना कोणत्या साखर कारखान्याचा निरोप नाही. त्यामुळे कुटुंबाची उपजीविका भागवायची कशी, असा मोठा प्रश्न या कामगारांसमोर आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसह परराज्यातील साखर कारखाने मे महिन्यातच ऊसतोड कामगारांना प्रति कोयता एक ते दीड लाखाची उचल देतात. मात्र, दुष्काळाच्या झळा साखर कारखान्यांसह ऊसतोड कामगारांनाही सोसाव्या लागत आहेत. ज्या कारखान्यांकडून बोलावणे आले त्या कारखान्यांनी १५ ते २० हजार रुपयांवरच कामगारांची बोळवण केली. कमी पैशांमुळे कारखान्यांकडे जाण्याचे टाळले तर इथल्या दुष्काळी स्थितीत उपजीविका भागवायची कशी? ही समस्याही कामगारांना भेडसावणारी आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारही मिळेल ती उचल स्वीकारत आहेत.