शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

राज्यपाल अन् सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी

By admin | Updated: September 4, 2014 02:20 IST

नवे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि आघाडी सरकारमध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडल्याचे चित्र बुधवारी समोर आले.

मुंबई : नवे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि आघाडी सरकारमध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडल्याचे चित्र बुधवारी समोर आले. गृहमंत्री वा गृहराज्य मंत्र्यांच्या परस्पर राज्यपाल थेट पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत असल्याबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. 
गृहमंत्र्यांना बोलावून राज्यपालांनी आढावा घेतला तर समजू शकतो, पण थेट अधिका:यांना ते कसे बोलावू शकतात, असा सवाल गृहमंत्री पाटील यांनी केला आहे. राज्यपाल तेलंगणाचे असून आंध्र प्रदेशशी महाराष्ट्राचा पाण्यावरून वाद सुरू असताना विद्यासागर राव यांना केंद्र सरकारने राज्यपाल म्हणून कसे पाठविले, असा सवालही पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी आर. आर. यांची बाजू उचलून धरली.  पण राज्यपालांवरून जास्त चर्चा करू नये, असे मत व्यक्त करीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेवर पडदा टाकला.
राज्याचे माजी मुख्य सचिव जे.एस.सहारिया यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल राव यांच्याकडे पाठविला होता. मात्र, या प्रस्तावाला राज्य मंत्रिपरिषदेची मान्यता नाही, असे कारण देत त्यांनी तो परत पाठविला. त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहारिया यांच्या नावाची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)