शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पेरणी धोक्यात

By admin | Updated: June 26, 2014 00:52 IST

तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न होताच शेतकऱ्यांनी कपाशीची धूळ पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड

शेतकरी संकटात : दुबार पेरणीची शक्यताहिंगणा : तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न होताच शेतकऱ्यांनी कपाशीची धूळ पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड असून आर्थिक नुकसानीच्या भीतीने बळीराजा हादरला आहे. जून महिन्यातील १७, १८ व १९ तारखेला तालुक्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. कृषी विभागानुसार केवळ ३८.७ मिलि पावसाची नोंद झाली. हंगाम चुकू नये म्हणून कापूस उत्पादकांनी कपाशीच्या पेरणीची घाई केली. अशातच पावसाने दडी मारल्याने अंकुरलेले बियाणे करपत आहेत. तालुक्यात कपाशी लागवडीचे लक्षांक क्षेत्र १८ हजार हेक्टर आहे. सुमारे नऊ हजार हेक्टर क्षेत्रात धूळ पेरणी झाली असल्याची माहिती आहे. सोयाबीन पेरणीचे लक्षांक क्षेत्र ९५०० हेक्टरवर राहील, असा अंदाज कृषी विभागाचा होता. त्यातच जवळपास चार हजार हेक्टरवरील सोयाबीनची धूळ पेरणी आटोपली. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस बरसला नाही तर बियाणे अन् शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चुराडा होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. आधीच कर्जबाजारी असलेला बळीराजा या नव्या संकटामुळे चिंताग्रस्त झाला आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी तुषार सिंचन सुरू करून पिकांना जगविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाशिवाय तरणोपाय नाही. तालुक्यातील भूजल पातळीत या महिन्यात लक्षणीय घट झाली आहे.तालुक्यातील आमगाव-देवळी, मोहगाव, धानुली, कान्होलीबारा, गुमगाव, टाकळघाट, अडेगाव, कवडस या शिवारात धूळ पेरणी अधिक आहे. यास चुकीच्या हवामानाचा अंदाजही कारणीभूत असल्याचे जाणकारांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)