शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पेरणी धोक्यात

By admin | Updated: June 26, 2014 00:52 IST

तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न होताच शेतकऱ्यांनी कपाशीची धूळ पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड

शेतकरी संकटात : दुबार पेरणीची शक्यताहिंगणा : तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न होताच शेतकऱ्यांनी कपाशीची धूळ पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड असून आर्थिक नुकसानीच्या भीतीने बळीराजा हादरला आहे. जून महिन्यातील १७, १८ व १९ तारखेला तालुक्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. कृषी विभागानुसार केवळ ३८.७ मिलि पावसाची नोंद झाली. हंगाम चुकू नये म्हणून कापूस उत्पादकांनी कपाशीच्या पेरणीची घाई केली. अशातच पावसाने दडी मारल्याने अंकुरलेले बियाणे करपत आहेत. तालुक्यात कपाशी लागवडीचे लक्षांक क्षेत्र १८ हजार हेक्टर आहे. सुमारे नऊ हजार हेक्टर क्षेत्रात धूळ पेरणी झाली असल्याची माहिती आहे. सोयाबीन पेरणीचे लक्षांक क्षेत्र ९५०० हेक्टरवर राहील, असा अंदाज कृषी विभागाचा होता. त्यातच जवळपास चार हजार हेक्टरवरील सोयाबीनची धूळ पेरणी आटोपली. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस बरसला नाही तर बियाणे अन् शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चुराडा होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. आधीच कर्जबाजारी असलेला बळीराजा या नव्या संकटामुळे चिंताग्रस्त झाला आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी तुषार सिंचन सुरू करून पिकांना जगविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाशिवाय तरणोपाय नाही. तालुक्यातील भूजल पातळीत या महिन्यात लक्षणीय घट झाली आहे.तालुक्यातील आमगाव-देवळी, मोहगाव, धानुली, कान्होलीबारा, गुमगाव, टाकळघाट, अडेगाव, कवडस या शिवारात धूळ पेरणी अधिक आहे. यास चुकीच्या हवामानाचा अंदाजही कारणीभूत असल्याचे जाणकारांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)