शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जागावाटप ठरल्यानुसारच!

By admin | Updated: November 22, 2015 01:50 IST

राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला किती जागा द्यायच्या याचा अजेंडा आधीच ठरला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारही आधी ठरल्याप्रमाणेच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- गोपालकृष्ण मांडवकर,  चंद्रपूर

राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला किती जागा द्यायच्या याचा अजेंडा आधीच ठरला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारही आधी ठरल्याप्रमाणेच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होण्याचे संकेतही त्यांनी दिले.चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या मोहर्ली येथे आयोजित दोन दिवसीय पर्यावरण पर्यटन आणि समुदाय निसर्ग प्रोत्साहन कार्यशाळेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्या वेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून कॅबिनेटपदांवर दावा केला जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तारापूर्वी आपल्या पक्षाची बैठक घेऊन खातेवाटपाबद्दल ठरविले जाणार आहे. शिवसेनेकडून अधिक जागांची मागणी होत असली तरी युती केली तेव्हाच कुणाला किती जागा द्यायच्या याबद्दल सारेच ठरले आहे. त्यामुळे आता त्यावर नव्याने कुणी चर्चा उकरून काढण्यात अर्थ नाही. तूरडाळीचा दर अद्यापही उतरला नसल्याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, डाळीचा देशात तुटवडा आहे. डाळ उत्पादक राज्यात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी सततच्या दोन हंगामांतील नापिकीमुळे उत्पादन खालावले आहे. देशात २५० लाख मेट्रीक टन डाळीची गरज आहे. त्यातही ५० लाख मे. टन डाळीची आयात करावी लागते. मात्र ज्या देशातून डाळीची आयात होते, त्या देशातील हंगामात आणि आपल्या हंगामात तीन महिन्यांचे अंतर असल्याने आयातीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेतकऱ्यांप्रति राज्य सरकार संवेदनशीलदुष्काळी मदतीवर जनता नाखुश असल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, आपले सरकार शेतकऱ्यांप्रति संवेदनशील आहे. महसुली अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या गावांच्या यादीनुसार दुष्काळाची घोषणा सरकारने केली आहे. गतवर्षी ८ हजार कोटी रुपयांची मदत सरकारने शेतकऱ्यांंना केली. केंद्राने फक्त २ कोटींचा निधी देऊनही राज्याने अधिकचा निधी यासाठी दिला. आपल्या सरकारने ८ हजार कोटींची मदत केली असली तरी गेल्या सरकारने १५ वर्षांत फक्त १३ हजार कोटींची मदत दिली, अशी टीकाही त्यांनी केली.