शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

शहापुरातील सोनशेत गाव चाळीस वर्षे अंधारात

By admin | Updated: April 23, 2015 05:27 IST

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा असल्या तरी आधुनिक काळात जीवनमान उंचावण्यासाठी विजेची नितांत गरज आहे

भरत उबाळे, शहापूरअन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा असल्या तरी आधुनिक काळात जीवनमान उंचावण्यासाठी विजेची नितांत गरज आहे. शहरात वीज नसेल तर पानही हलू शकत नाही. मात्र, ठाणे जिल्ह्णातील शहापूर तालुक्यात वसलेल्या अवघ्या ३५ घरांच्या सोनशेत या वस्तीला गेली ४० वर्षे वीज नाही, हे भीषण वास्तव आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी वसलेल्या गावात आजतागायत विजेची साधी तारही पोहोचलेली नाही. संध्याकाळ झाल्यावर येथे रॉकेलच्या चिमण्या पेटतात अथवा चुलीच्या उजेडावर घरातला कारभार चालतो. गावकऱ्यांनी वीज मिळावी म्हणून महावितरणच्या सहायक अभियंत्यांना भेटण्याचे खूप वेळा प्रयत्न केले, पण गावकऱ्यांची साधी भेट घेण्याचेही शासनाच्या या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सौजन्य दाखवले नाही. वीजजोडणीबाबत होणाऱ्या दुर्लक्षाबाबत मनसेचे तालुकाप्रमुख जयवंत मांजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिरगाव, नेहरोली, जांभे, लेनाड, शेंद्रूण या गावांना जोडलेले सोनशेत हे आदिवासी वस्तीचे ३५ घरांचे सुमारे १२० लोकसंख्येचे गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. महसुली गावांना सर्व शासन सुविधा उपलब्ध करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सोनशेतमध्ये आजतागायत साधी वीजही पोहोचली नसल्याने हे गाव अंधाराचे गाव ठरले आहे. सोनशेत गावासाठी स्वतंत्र वीजपुरवठ्याची तरतूद मंजूर झाली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आदिवासी वस्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मधुकर वाघ, रमेश हिलम या ग्रामस्थांनी केला आहे.