शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

शहापुरातील सोनशेत गाव चाळीस वर्षे अंधारात

By admin | Updated: April 23, 2015 05:27 IST

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा असल्या तरी आधुनिक काळात जीवनमान उंचावण्यासाठी विजेची नितांत गरज आहे

भरत उबाळे, शहापूरअन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा असल्या तरी आधुनिक काळात जीवनमान उंचावण्यासाठी विजेची नितांत गरज आहे. शहरात वीज नसेल तर पानही हलू शकत नाही. मात्र, ठाणे जिल्ह्णातील शहापूर तालुक्यात वसलेल्या अवघ्या ३५ घरांच्या सोनशेत या वस्तीला गेली ४० वर्षे वीज नाही, हे भीषण वास्तव आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी वसलेल्या गावात आजतागायत विजेची साधी तारही पोहोचलेली नाही. संध्याकाळ झाल्यावर येथे रॉकेलच्या चिमण्या पेटतात अथवा चुलीच्या उजेडावर घरातला कारभार चालतो. गावकऱ्यांनी वीज मिळावी म्हणून महावितरणच्या सहायक अभियंत्यांना भेटण्याचे खूप वेळा प्रयत्न केले, पण गावकऱ्यांची साधी भेट घेण्याचेही शासनाच्या या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सौजन्य दाखवले नाही. वीजजोडणीबाबत होणाऱ्या दुर्लक्षाबाबत मनसेचे तालुकाप्रमुख जयवंत मांजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिरगाव, नेहरोली, जांभे, लेनाड, शेंद्रूण या गावांना जोडलेले सोनशेत हे आदिवासी वस्तीचे ३५ घरांचे सुमारे १२० लोकसंख्येचे गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. महसुली गावांना सर्व शासन सुविधा उपलब्ध करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सोनशेतमध्ये आजतागायत साधी वीजही पोहोचली नसल्याने हे गाव अंधाराचे गाव ठरले आहे. सोनशेत गावासाठी स्वतंत्र वीजपुरवठ्याची तरतूद मंजूर झाली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आदिवासी वस्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मधुकर वाघ, रमेश हिलम या ग्रामस्थांनी केला आहे.