शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
6
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
7
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
8
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
10
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
11
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
12
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
13
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
14
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
15
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
16
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
17
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
18
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
19
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
20
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा

बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने समाधान

By admin | Updated: September 24, 2016 01:15 IST

तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे बारामती तालुक्यावरील दुष्काळाचे सावट कमी होण्यास मदत झाली

बारामती : तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे बारामती तालुक्यावरील दुष्काळाचे सावट कमी होण्यास मदत झाली आहे. तर, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या ओढे, नाला खोलीकरणाच्या कामांत पावसाचे पाणी साठले आहे. जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, लोणी भापकर, मोरगाव या भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. या पावसाने जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या पावसाने शेतकऱ्यांनी रब्बी पेरण्यांची तयारी सुरू केली आहे. उशिराने केलेल्या खरिपातील बाजरीला या पावसाचा फायदा झाला. बारामती तालुका रब्बी हंगामाचा म्हणून ओळखला जातो; परंतु खरिपाच्या हंगामातदेखील बाजरीसह, सोयाबीन, कडधान्ये आदी पिकांच्या पेरण्या केल्या जातात. सुरुवातीला पडलेल्या पावसावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर झालेल्या पेरण्या पावसाअभावी वाया गेल्या; मात्र काही शेतकऱ्यांनी उशिराने खरिपाच्या बाजरीची पेरणी केली. त्यांना हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. सध्या बारामती तालुक्यात रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या जातात. बारामती तालुक्यात जवळपास ८५ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या होतात. त्यामुळे या परतीच्या पावसाचा रब्बी हंगामाला चांगला फायदा होईल, असे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)>चार दिवसांपासून संततधार पाऊस सर्वदूर पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. सलग ४ वर्षांपासून पर्जन्यमान कमी होते. मोरगाव, लोणी भापकर, तरडोलीसह त्या भागातील २२ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष सतत आहे. त्याचबरोबर सुपे परगण्यातील सतत दुष्काळी गावांमध्येदेखील पावसाचे प्रमाण कमी होते. >पुरंदर उपसा, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनांतून पाणी देण्यात आले. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास ६३ गावांना टँकरचा आधार होता. आता या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. तालुक्यात ओढा, नाले, तलाव खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. >परतीचा पाऊस जोरदार झाल्यास प्रत्यक्ष पाणी साठवण्यासाठी उपयोग होणार आहे. सध्या मोरगाव, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे आदी भागांत केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे फलद्रूप दिसून येत आहे. या पावसाने केवळ जिरायती भागात हजेरी लावली आहे. ८५ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या...गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसाने जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, लोणी भापकर, मोरगाव भागात जलयुक्त शिवारांतर्गत झालेल्या कामातून पाणी साठल्याचे चित्र आहे. या पावसाचा रब्बीच्या पेरण्यांना उपयोग होणार आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे. बारामती तालुक्यात ८५ हजार हेक्टर रब्बी पिकांच्या पेरण्या होतात, असे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.