शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने समाधान

By admin | Updated: September 24, 2016 01:15 IST

तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे बारामती तालुक्यावरील दुष्काळाचे सावट कमी होण्यास मदत झाली

बारामती : तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे बारामती तालुक्यावरील दुष्काळाचे सावट कमी होण्यास मदत झाली आहे. तर, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या ओढे, नाला खोलीकरणाच्या कामांत पावसाचे पाणी साठले आहे. जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, लोणी भापकर, मोरगाव या भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. या पावसाने जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या पावसाने शेतकऱ्यांनी रब्बी पेरण्यांची तयारी सुरू केली आहे. उशिराने केलेल्या खरिपातील बाजरीला या पावसाचा फायदा झाला. बारामती तालुका रब्बी हंगामाचा म्हणून ओळखला जातो; परंतु खरिपाच्या हंगामातदेखील बाजरीसह, सोयाबीन, कडधान्ये आदी पिकांच्या पेरण्या केल्या जातात. सुरुवातीला पडलेल्या पावसावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर झालेल्या पेरण्या पावसाअभावी वाया गेल्या; मात्र काही शेतकऱ्यांनी उशिराने खरिपाच्या बाजरीची पेरणी केली. त्यांना हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. सध्या बारामती तालुक्यात रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या जातात. बारामती तालुक्यात जवळपास ८५ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या होतात. त्यामुळे या परतीच्या पावसाचा रब्बी हंगामाला चांगला फायदा होईल, असे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)>चार दिवसांपासून संततधार पाऊस सर्वदूर पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. सलग ४ वर्षांपासून पर्जन्यमान कमी होते. मोरगाव, लोणी भापकर, तरडोलीसह त्या भागातील २२ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष सतत आहे. त्याचबरोबर सुपे परगण्यातील सतत दुष्काळी गावांमध्येदेखील पावसाचे प्रमाण कमी होते. >पुरंदर उपसा, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनांतून पाणी देण्यात आले. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास ६३ गावांना टँकरचा आधार होता. आता या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. तालुक्यात ओढा, नाले, तलाव खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. >परतीचा पाऊस जोरदार झाल्यास प्रत्यक्ष पाणी साठवण्यासाठी उपयोग होणार आहे. सध्या मोरगाव, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे आदी भागांत केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे फलद्रूप दिसून येत आहे. या पावसाने केवळ जिरायती भागात हजेरी लावली आहे. ८५ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या...गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसाने जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, लोणी भापकर, मोरगाव भागात जलयुक्त शिवारांतर्गत झालेल्या कामातून पाणी साठल्याचे चित्र आहे. या पावसाचा रब्बीच्या पेरण्यांना उपयोग होणार आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे. बारामती तालुक्यात ८५ हजार हेक्टर रब्बी पिकांच्या पेरण्या होतात, असे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.