शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत सौरपंप

By admin | Updated: October 22, 2015 01:14 IST

राज्यातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरायची असून, प्रथम

मुंबई : राज्यातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरायची असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर विपरित परिणाम होऊ नये, तसेच कृषिपंपाला किफायतशीर वीजपुरवठा मिळावा व विजेचे बील भरण्यापासून त्याची कायमस्वरुपी सुटका व्हावी, यासाठी शासनाने १0 हजार सौर कृषिपंप बसविण्याचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ३ ते ५ अश्वशक्तीचेहे कृषिपंप पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात बसविले जाणार आहेत. (प्रतिनिधी) महावितरणकडून घेता येणार लाभ शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरीचा लाभ घेतलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेली गावे, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले भाग व महावितरणकडे पैसे भरून ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे नजीकच्या काळात वीजपुरवठा करणे शक्य नसलेले सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, असे महावितरणने कळविले आहे. ३ अश्वशक्ती ए.सी.पंपासाठी शेतकऱ्यांना १६ हजार २00 रुपये भरावे लागणार आहेत, तर ३ अश्वशक्ती डी.सी.पंपासाठी २0 हजार २५0, ५ अश्वशक्ती पंपासाठी २७ हजार, ५ अश्वशक्ती डी.सी.पंपासाठी ३३ हजार ७५0 आणि ७.५ अश्वशक्ती ए.सी.पंपासाठी ३६ हजार रुपये शेतकऱ्यांना जमा करावे लागणार आहेत. हे सौर कृषिपंप बसविल्यापासून पाच वर्षे देशभाल दुरुस्तीची पूर्ण जबाबदारी पुरवठादार एजन्सीची राहणार आहे.