शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

सोलापूर - १६१ वर्षाचा डिकसळचा धोकादायक पूल

By admin | Updated: August 6, 2016 15:06 IST

महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याला जोडणारा भीमा नदीवरील डिकसळचा ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आला आहे

करमाळा तालुका : २००० साली पुलाचे आयुष्य संपल्याचे ब्रिटिश कंपनीचे पत्र
नासीर कबीर / ऑनलाइन लोकमत -
करमाळा, दि. 6 - महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याला जोडणारा भीमा नदीवरील डिकसळचा ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आला आहे. ब्रिटिशांनी सन १८५५ साली भीमा नदीवर बांधलेल्या या पुलाचे वय १६१ वर्षे असून, सन २००० मध्ये ब्रिटिश सरकारने या पुलाचे आयुष्य संपले असून, वाहतुकीस धोकादायक असल्याचे केंद्र व राज्य सरकारला कळवलं आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आजही या पुलावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत आहे तर या परिसरात भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसाही सुरू आहे. 
 
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली ते इंदापूर तालुक्यातील डिकसळच्या सीमेवरून वाहत जाणाºया भीमा नदीवर हा ब्रिटिशकालीन पूल असून, ब्रिटिशांनी १८५५ साली तो बांधला. पुणे जिल्ह्यातील भिगवणला जवळचा व एकमेव मार्ग म्हणून या पुलावरून करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जिंती, कोंढारचिंचोली, टाकळी, केत्तूर नं. १ व २, वाश्ािंबे, गोयेगाव, कुंभारगाव, सावडी, दिवेगव्हाण, कात्रज, खातगाव, पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहोरवाडी, भगतवाडी, घरतवाडी, राजुरी, सोगाव, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, उम्रड, मांजरगाव, उंदरगाव आदी ३५ गावांचा पुणे जिल्ह्यातील गावांशी दैनंदिन दळणवळणाचा संपर्क आहे. 
डिकसळच्या पुलाचे बांधकाम होऊन १६१ वर्षे पूर्ण झाली असून, या पुलाचे आयुष्यमान केव्हाच संपले आहे. पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे लेखी पत्र ब्रिटिश सरकारने १५ वर्षांपूर्वीच केंद्र व राज्य सरकारला पाठविले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाच्या दोन्ही टोकाला भीमा नदीवरील जुना रेल्वे पूल कमकुवत असल्याने जडवाहनासाठी धोकादायक जीप, कार, दुचाकी व जडवाहनासाठी वापर करू नये, असे धोक्याचे फलक लावून ठेवले आहेत. त्याची दखल घेऊन महामंडळाने एस.टी.ची वाहतूक बंद केली. पण सर्रास या पुलावरून करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातून बारामती अ‍ॅग्रो, दौंड शुगर, माळेगाव, भवानीनगर आदी साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक होते. 
 
खातगाव, कात्रज या भागातून भीमा नदीतील वाळू उपसा करून या पुलावरून जडवाहतूक सर्रास होते. पाच वर्षांपूर्वी कोंढारचिंचोली ते डिकसळ या रस्त्याच्या कामासाठी पुनर्वसन खात्याने दहा क ोटी रुपयांचा निधी खर्च करून पुलासह रस्ता सुस्थितीत केला. पण सध्या पुलावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत असल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाचे कठडे तुटले आहेत. या परिस्थितीमध्येसुद्धा या पुलावरून बेमालूमपणे जीवाची पर्वा न करता जडवाहतूक सुरू आहे.