शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

सामाजिक प्रतिष्ठेच्या हुंड्याचे चढते रेटकार्ड

By admin | Updated: February 26, 2016 07:49 IST

हुंड्यातली जुलूम जबरदस्ती कमी होत आता तो ‘स्वेच्छेने’ देण्याघेण्याचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनत चालला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. २५ - बोहल्यावर चढू पाहणाऱ्या आजच्या तरुण मुलांच्या बाशिंगबळात आजही ‘हुंडा’ महत्वाचा आहे. हुंड्यातली जुलूम जबरदस्ती कमी होत आता तो ‘स्वेच्छेने’ देण्याघेण्याचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनत चालला आहे. 
हुंडाबंदी कायद्याने हुंडा देणेघेणे बंद तर झाले नाहीच उलट बदलत्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीत, आणि सेलिब्रेशनच्या रेट्यात आता ‘हुंडा’ रंगरूप बदलत राजीखुशीचा मामला बनतो आहे, त्यात ना कुणाला कसला अपराध वाटतोय, ना कसला अपराध गंड!
हे ‘मत’ आहे महाराष्ट्रभरातल्या, विशेषत: खेड्यापाड्यात आणि निमशहरी भागात राहणाऱ्या लग्नाच्या वयातल्या मुलामुलींचं.
‘लोकमत ऑक्सिजन’ पुरवणीच्या वतीने घेण्यात आलेल्या वाचक चर्चेत तीन हजाराहून अधिक पत्रं आणि सातशेहून अधिक इमेल्स पाठवत सहभागी झालेल्या तरुण मुलामुलींनी हुंड्याची नवीन परिभाषाच मांडली आहे. आणि त्यांच्या मते, जर देणारा देतो, घेणारा घेतो, तर यात गुन्हा कुठे आणि कसला होतो? ‘हुंडा’ द्यावा लागतो, त्यापायी लग्न मोडतं, सासरी छळ होतो या कहाण्या तर मुलींच्या वाट्याला आजही नित्याच्या आहेत. 
मात्र आधुनिक, सुसंस्कृत, आणि स्वतंत्र म्हणवणाऱ्या तरुण मुलांवर अशी काय सक्ती असते की, लग्नात त्यांना हुंडा घ्यावाच लागतो? कुठल्या प्रकारचं सामाजिक, मानसिक प्रेशर किंवा पालकांची सक्ती असते म्हणून ते हुंड्याला नाही म्हणू शकत नाहीत? असे प्रश्न ‘ऑक्सिजन’ने राज्यभरातल्या तरुण मुलग्यांसमोर मांडले होते. त्याला उत्तर म्हणून आलेल्या पत्रांच्या ढिगात जी उत्तरं सापडली ती चक्रावून टाकणारी आहेत.
हे तरुण मुलगे सांगतात की, हुंडा घ्यायलाच हवा अशी पालकांची सक्ती असतेच, पण हुंड्याला नकार दिला तर मुलींचे पालक मुलातच दोष शोधतात, बदनामी करतात आणि लग्न जमणं मुश्किल होते. दुसरीकडे उच्चशिक्षित आणि शहरी नोकरीवाल्या मुलांशीच आपल्या मुलीचे लग्न व्हावे, खेड्यापाड्यातला जावई नको म्हणत पालकही अशा स्थळांचा शोध काही लाखांची तजबीज करुनच घेतात आणि त्यामुळे राज्यभरात उच्चशिक्षित सरकारी-खाजगी लग्नाळू मुलांच्या हुंड्याचं रेटकार्डच तयार झालेले आहे असेही ही पत्रे सांगतात. 
म्हणूनच काही लाखांच्या रोख रकमेसह थाटामाटात लग्न, मुलीला संपूर्ण संसार भेट देणं, दागिने, ते थेट देशविदेशातलं हनिमून पॅकेज गिफ्ट करणं इतपर्यंत टोलेजंग लग्न दुष्काळाच्या सावटातही साजरी होत आहेत. ‘ऐपत’ असलेले मुलींचे वडील ‘हौशीने’ आणि ‘स्वत:हून’ हुंड्याच्या थैल्या सोडत मनासारखा जावई निवडत आहेत. 
‘हुंडा’ असं लेबल न लागता लग्नाची ही देणीघेणी नेमकी का आणि कशामुळे होतात? ती कुणाला फायदेशीर आणि सोयीची वाटतात? तरुण मुलामुलींच्याही हे सारे का पथ्यावर पडते आहे याचे विस्तृत विश्लेषण वाचा, आजच्या ‘आक्सिजन’ पुरवणीत..