शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सामाजिक प्रतिष्ठेच्या हुंड्याचे चढते रेटकार्ड

By admin | Updated: February 26, 2016 07:49 IST

हुंड्यातली जुलूम जबरदस्ती कमी होत आता तो ‘स्वेच्छेने’ देण्याघेण्याचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनत चालला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. २५ - बोहल्यावर चढू पाहणाऱ्या आजच्या तरुण मुलांच्या बाशिंगबळात आजही ‘हुंडा’ महत्वाचा आहे. हुंड्यातली जुलूम जबरदस्ती कमी होत आता तो ‘स्वेच्छेने’ देण्याघेण्याचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनत चालला आहे. 
हुंडाबंदी कायद्याने हुंडा देणेघेणे बंद तर झाले नाहीच उलट बदलत्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीत, आणि सेलिब्रेशनच्या रेट्यात आता ‘हुंडा’ रंगरूप बदलत राजीखुशीचा मामला बनतो आहे, त्यात ना कुणाला कसला अपराध वाटतोय, ना कसला अपराध गंड!
हे ‘मत’ आहे महाराष्ट्रभरातल्या, विशेषत: खेड्यापाड्यात आणि निमशहरी भागात राहणाऱ्या लग्नाच्या वयातल्या मुलामुलींचं.
‘लोकमत ऑक्सिजन’ पुरवणीच्या वतीने घेण्यात आलेल्या वाचक चर्चेत तीन हजाराहून अधिक पत्रं आणि सातशेहून अधिक इमेल्स पाठवत सहभागी झालेल्या तरुण मुलामुलींनी हुंड्याची नवीन परिभाषाच मांडली आहे. आणि त्यांच्या मते, जर देणारा देतो, घेणारा घेतो, तर यात गुन्हा कुठे आणि कसला होतो? ‘हुंडा’ द्यावा लागतो, त्यापायी लग्न मोडतं, सासरी छळ होतो या कहाण्या तर मुलींच्या वाट्याला आजही नित्याच्या आहेत. 
मात्र आधुनिक, सुसंस्कृत, आणि स्वतंत्र म्हणवणाऱ्या तरुण मुलांवर अशी काय सक्ती असते की, लग्नात त्यांना हुंडा घ्यावाच लागतो? कुठल्या प्रकारचं सामाजिक, मानसिक प्रेशर किंवा पालकांची सक्ती असते म्हणून ते हुंड्याला नाही म्हणू शकत नाहीत? असे प्रश्न ‘ऑक्सिजन’ने राज्यभरातल्या तरुण मुलग्यांसमोर मांडले होते. त्याला उत्तर म्हणून आलेल्या पत्रांच्या ढिगात जी उत्तरं सापडली ती चक्रावून टाकणारी आहेत.
हे तरुण मुलगे सांगतात की, हुंडा घ्यायलाच हवा अशी पालकांची सक्ती असतेच, पण हुंड्याला नकार दिला तर मुलींचे पालक मुलातच दोष शोधतात, बदनामी करतात आणि लग्न जमणं मुश्किल होते. दुसरीकडे उच्चशिक्षित आणि शहरी नोकरीवाल्या मुलांशीच आपल्या मुलीचे लग्न व्हावे, खेड्यापाड्यातला जावई नको म्हणत पालकही अशा स्थळांचा शोध काही लाखांची तजबीज करुनच घेतात आणि त्यामुळे राज्यभरात उच्चशिक्षित सरकारी-खाजगी लग्नाळू मुलांच्या हुंड्याचं रेटकार्डच तयार झालेले आहे असेही ही पत्रे सांगतात. 
म्हणूनच काही लाखांच्या रोख रकमेसह थाटामाटात लग्न, मुलीला संपूर्ण संसार भेट देणं, दागिने, ते थेट देशविदेशातलं हनिमून पॅकेज गिफ्ट करणं इतपर्यंत टोलेजंग लग्न दुष्काळाच्या सावटातही साजरी होत आहेत. ‘ऐपत’ असलेले मुलींचे वडील ‘हौशीने’ आणि ‘स्वत:हून’ हुंड्याच्या थैल्या सोडत मनासारखा जावई निवडत आहेत. 
‘हुंडा’ असं लेबल न लागता लग्नाची ही देणीघेणी नेमकी का आणि कशामुळे होतात? ती कुणाला फायदेशीर आणि सोयीची वाटतात? तरुण मुलामुलींच्याही हे सारे का पथ्यावर पडते आहे याचे विस्तृत विश्लेषण वाचा, आजच्या ‘आक्सिजन’ पुरवणीत..