शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

सोशल मीडियामुळे मुलाचा चार तासांत शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 00:35 IST

आईला वाटले वडिलांनी घरी नेले, तर वडिलांना वाटले आईबरोबर आहे, या गैरसमजातून चार तास आपल्या पालकांपासून ताटातूट झालेला मुलगा सोशल मीडियामुळे भेटला. ही घटना नारायणगाव येथे घडली.

नारायणगाव : आईला वाटले वडिलांनी घरी नेले, तर वडिलांना वाटले आईबरोबर आहे, या गैरसमजातून चार तास आपल्या पालकांपासून ताटातूट झालेला मुलगा सोशल मीडियामुळे भेटला. ही घटना नारायणगाव येथे घडली. याबाबत माहिती अशी, हिवरेतर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील अतिश पांडुरंग शिंदे (वय ३०) व त्यांची पत्नी भावना (वय २५) हे दुपारी १२ वाजता आपला मुलगा संग्राम (वय ३) यांच्यासह नारायणगाव येथे कामानिमित्त आले होते. काम उरकल्यानंतर मोबाइल फोनच्या नादात अतिश शिंदे मोटारसायकल घेऊन पुन्हा गावी हिवरे येथे परतले. त्याच वेळी मुलगा संग्राम हा थोडा बाजूला गेला व त्याच्या आईला वाटले की, संग्रामला त्याच्या वडिलांनी घरी नेले. मात्र प्रत्यक्ष संग्राम तेथेच रडत राहिला. संग्रामला रडताना पाहून फळविक्रेते गजानन कोंडाजी दरेकर व सुरेश रामचंद्र बनकर यांनी त्याच्याजवळ विचारपूस केली; मात्र तो रडायचा थांबेना. हे पाहून महेंद्र खेबडे, चेतन पडघम व किरण वाजगे यांनी या बालकाची माहिती सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना दिली. त्यानुसार मुजावर यांनी ट्रॅफिक आॅर्डन गणेश बेल्हेकर यांना संबंधित बालकाला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत बाळाचे फोटो वाजगे, खेबडे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल केले. या दरम्यान नारायणगाव बसस्थानकात हेमंत वारूळे यांनी बालकाविषयी बसस्थानकातील ध्वनिक्षेपकाद्वारे(माईकद्वारे) माहिती जाहीर केली. दुपारी चारच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती व फोटोद्वारे मुलाच्या वडिलांना मुलगा हरविल्याचे समजले. मेसेजमधील संपर्क क्रमांकानुसार अतीश शिंदे यांनी गणेश बेल्हेकर, महेश गाढवे व ठाणे अंमलदार आबा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. अखेर चार तासांनंतर ताटातूट झालेल्या संग्रामची आईवडिलांशी भेट झाली. (वार्ताहर)