शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात ‘सोशल’ लढा

By admin | Updated: March 7, 2017 02:09 IST

प्रसिध्दी माध्यमांबरोबरच प्रचार, प्रसाराचे उत्तम साधन म्हणून सध्या सोशल मीडियाचा वापर होऊ लागला

वैभव गायकर,पनवेल- प्रसिध्दी माध्यमांबरोबरच प्रचार, प्रसाराचे उत्तम साधन म्हणून सध्या सोशल मीडियाचा वापर होऊ लागला आहे. या माध्यमाचा योग्यरीत्या, नियोजनपूर्वक वापर केल्यास समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळतोच, हे प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला सोशल मीडियावर मिळणाऱ्या पाठिंब्यावरून मान्य करावे लागेल.आपल्या न्याय हक्कांसाठी अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा सिडकोबरोबरच लढा सुरू आहे. सिडकोने ठाणे, रायगड या दोन जिल्ह्यातील सुमारे ९५ गावांच्या जमिनी संपादित केल्या व नवी मुंबई शहर वसविले. मात्र दिलेली आश्वासने पाळली नसल्याने प्रकल्पग्रस्तांकडून लहान-मोठी शेकडो आंदोलने, मोर्चे, निदर्शने करण्यात आली. तरीही आजतागायत त्यांचे प्रश्न सुटलेले नाही. आता प्रकल्पग्रस्तांची चौथी पिढी आंदोलनात उतरली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा तरुण सिडकोविरोधात एकवटला आहे.प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणाऱ्या आगरी कोळी युथ फाउंडेशनने छेडलेल्या लढ्याला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळत आहे. १४ मार्च रोजी सिडकोविरोधात एल्गार पुकारला आहे. मी भूमिपुत्र... माझा हक्क... माझा लढा... ही चळवळ गावोगावी उभी करून ती प्रकल्पग्रस्तांपर्यंत पोहोचल्याने हजारो तरुण यात सहभागी होत आहे. फाउंडेशनने उपोषणात पाच मागण्या सिडकोसमोर ठेवल्या आहेत. त्यात गावठाण व विस्तारित गावठाणातील जमिनीचा सनद स्वरूपात अधिकार, गावठाण व गावठाणातील घरांना संरक्षण व नियमितीकरण, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या उद्योग-व्यवसाय, शाळा प्रवेशामध्ये आरक्षण आणि विद्यावेतनाचा अधिकार, प्रकल्पग्रस्तांचे राखून ठेवलेले ३.७५ टक्के भूखंड प्रकल्पग्रस्तांना परत करण्यात यावेत, एमआयडीसी क्षेत्रातील संपादित जमिनीच्या बदल्यात १५ टक्के भूखंड वाटप करावेत आदी मागण्यांचा समावेश आहे. >मराठा समाजाचाही पाठिंबाआगरी कोळी युथ फाउंडेशनने प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू केला आहे. ४५ वर्षांपासून सिडको व शासनाबरोबर भूमिपुत्र लढा देत असून शासन फक्त आश्वासनांवर बोळवण करत आहे. यामुळे आता निकराचा लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. १४ मार्चपासून सीबीडीमध्ये बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असून या लढ्याला प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर समाजाचा व संघटनांचाही पाठिंबा वाढत आहे. नवी मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चाच्यावेळी भूमिपुत्रांनी जाहीर पाठिंबा दिला होता. यामुळे आता मराठा समाजाने पत्रक काढून प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून सोशल मीडियामधून आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठीची जनजागृती सुरू केली आहे. >प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात नवी मुंबईमधील २८ गावांचा समावेश कमी प्रमाणात होता. लढ्याबाबत गावांमध्ये जनजागृतीसाठी बैठका घेण्यात आल्या. आमरण उपोषणाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. नवी मुंबईमधील उच्चशिक्षित मंडळींपर्यंत हा लढा पोहचला पाहिजे.- नीलेश पाटील, आगरी कोळी युथ फाउंडेशन>प्रकल्पग्रस्तांचा लढा सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहचला आहे. जरी २८ गावांत या लढ्याची जनजागृती केली गेली असली तरी या लढ्याच्या मागण्या संपूर्ण ९५ गावांना लाभदायक आहेत. म्हणून आम्ही देखील लढ्यात उतरणार आहोत.- समाधान खोपरकर, प्रकल्पग्रस्त तरुण, दापोली, पनवेल.