शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

मग शेतकऱ्यांना इन्क्रिमेंट (हमीभाव) नको का?

By admin | Updated: June 3, 2017 15:15 IST

मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या ठराविक मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय एका गटाने जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही.

- बाळकृष्ण परब
शेतकऱ्यांच्या संपामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी ठराविक मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय एका गटाने जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही. एकीकडे आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा मिळतोय, तर कर्जमाफी, हमीभाव यावरून शेतकऱ्यांचे फाजील लाड कशासाठी? असा सवाल विचारणाराही एक वर्ग आहे. पण खरंच शेतकऱ्यांचे लाड होताहेत का? शेती व्यवसाय अडचणीत नाही आहे का? शेतकरी सुखी समाधानी असूनही अवास्तव मागण्या करतोय का? याची उत्तरं नाही अशीच आहेत.
 
९०च्या दशकात आलेली खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची लाट, बदलते ऋतुचक्र वाढता उत्पादन खर्च यांचा मेळ घालताना शेतकरी मेटाकुटीस आलाय. उरलीसुरली कसर सरकारच्या धोरणांनी भरून काढलीय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर मार्ग उरलेला नाही. त्यामुळे काही जण आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. तर काही जणांचा संघर्ष सुरू आहे.
 
आम्ही कर भरतो. मग आमच्या करातून शेतकऱ्यांचे चोचले कशाला? असा सवालही काही विरोधक उपस्थित करताहेत. शेतकऱ्यांना प्राप्तिकर भरावा लागत नाही, हे खरं आहे. पण बी-बियाणी, खते, शेतीला लागणारी साधने यांच्या खरेदीवेळी त्याच्या खिशातून कर वसूल होतोच की. आठवडी बाजारातही स्थानिक प्रशासन कर वसूली करतेच की. बाकी आम्ही कर भळतो म्हणणाऱ्यांपैकी किती जण प्राप्तिकर वाचवण्यासाठी काय काय आकडेमोड करतात, यावर लिहायचे झाल्यास एक स्वतंत्र लेख होईल. असो विषयांतर नको. आपले उत्पन्न कितीही वाढले, इतर गोष्टी कितीही महागल्या तरी अन्नधान्य मात्र अगदी माफक दरात हवे असणारा हा एक वर्ग आपल्याकडे आहे. मग त्याचे उत्पादन करणारा शेतकरी कमी दरामुळे भिकेला लागेना का? आम्ही भरपेट जेवलो म्हणजे झाले! अशीच या वर्गाची अपेक्षा असते!
 
 अन्नधान्याची महागाई वाढली की ओरड करणारा हा वर्ग शेतकऱ्यांचा विचार कधी करतो का? तर अजिबात नाही! शेतीत अन्नधान्य पिकवायला घाम गाळावा लागतो, शेती उत्पादन घ्यायला गुंतवणूक करावी लागते, वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो, हे या मंडळींच्या गावीही नसते.
 
मागच्या 10 वर्षांत शेतीशी संबंधित घटकांच्या किमतीत भरमसाट वाढ झालीय! बैलांची साधारण जोडी खरेदी करायची म्हटले तरी 50 हजार लागतात. खतांच्या, कीटकनाशकांच्या, मजुरीच्या दरात 5 पट वाढ झालीय. त्यात हवामानाची अनिश्चितता आहेच. पिक आलं नाही, नुकसान झालं म्हणून कुणी मदतीला धावत नाही की बँका कर्जात सवलत देत नाहीत. असं असलं तरी शेतमाल माफक किमतीत उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा असते. आता उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत मिळाली तर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार? पण याचं उत्तर शेतकऱ्यांच्या संपाला, मागण्यांना विरोध करणाऱ्यांकडे नाही. सरकारी बाबू, कॉर्पोरेट ऑफिसर, संघटित कामगार अशा सर्वांनाच वर्षाकाठी ठराविक इन्क्रिमेंट मिळत असते. दरवर्षी अशी वाढ होणे आवश्यकच असते, हे तुम्हाला मान्य असेलच. मग वाढत्या महागाईला अनुसरून शेतक-यांनीही शेतमालाच्या दरात वाढ करून मागितली तर त्यात गैर काय? त्यांना हमीभाव, खर्चानुसार उत्पादनाची वाढीव किंमत मिळायला नको का?