शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

मग शेतकऱ्यांना इन्क्रिमेंट (हमीभाव) नको का?

By admin | Updated: June 3, 2017 15:15 IST

मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या ठराविक मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय एका गटाने जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही.

- बाळकृष्ण परब
शेतकऱ्यांच्या संपामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी ठराविक मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय एका गटाने जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही. एकीकडे आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा मिळतोय, तर कर्जमाफी, हमीभाव यावरून शेतकऱ्यांचे फाजील लाड कशासाठी? असा सवाल विचारणाराही एक वर्ग आहे. पण खरंच शेतकऱ्यांचे लाड होताहेत का? शेती व्यवसाय अडचणीत नाही आहे का? शेतकरी सुखी समाधानी असूनही अवास्तव मागण्या करतोय का? याची उत्तरं नाही अशीच आहेत.
 
९०च्या दशकात आलेली खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची लाट, बदलते ऋतुचक्र वाढता उत्पादन खर्च यांचा मेळ घालताना शेतकरी मेटाकुटीस आलाय. उरलीसुरली कसर सरकारच्या धोरणांनी भरून काढलीय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर मार्ग उरलेला नाही. त्यामुळे काही जण आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. तर काही जणांचा संघर्ष सुरू आहे.
 
आम्ही कर भरतो. मग आमच्या करातून शेतकऱ्यांचे चोचले कशाला? असा सवालही काही विरोधक उपस्थित करताहेत. शेतकऱ्यांना प्राप्तिकर भरावा लागत नाही, हे खरं आहे. पण बी-बियाणी, खते, शेतीला लागणारी साधने यांच्या खरेदीवेळी त्याच्या खिशातून कर वसूल होतोच की. आठवडी बाजारातही स्थानिक प्रशासन कर वसूली करतेच की. बाकी आम्ही कर भळतो म्हणणाऱ्यांपैकी किती जण प्राप्तिकर वाचवण्यासाठी काय काय आकडेमोड करतात, यावर लिहायचे झाल्यास एक स्वतंत्र लेख होईल. असो विषयांतर नको. आपले उत्पन्न कितीही वाढले, इतर गोष्टी कितीही महागल्या तरी अन्नधान्य मात्र अगदी माफक दरात हवे असणारा हा एक वर्ग आपल्याकडे आहे. मग त्याचे उत्पादन करणारा शेतकरी कमी दरामुळे भिकेला लागेना का? आम्ही भरपेट जेवलो म्हणजे झाले! अशीच या वर्गाची अपेक्षा असते!
 
 अन्नधान्याची महागाई वाढली की ओरड करणारा हा वर्ग शेतकऱ्यांचा विचार कधी करतो का? तर अजिबात नाही! शेतीत अन्नधान्य पिकवायला घाम गाळावा लागतो, शेती उत्पादन घ्यायला गुंतवणूक करावी लागते, वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो, हे या मंडळींच्या गावीही नसते.
 
मागच्या 10 वर्षांत शेतीशी संबंधित घटकांच्या किमतीत भरमसाट वाढ झालीय! बैलांची साधारण जोडी खरेदी करायची म्हटले तरी 50 हजार लागतात. खतांच्या, कीटकनाशकांच्या, मजुरीच्या दरात 5 पट वाढ झालीय. त्यात हवामानाची अनिश्चितता आहेच. पिक आलं नाही, नुकसान झालं म्हणून कुणी मदतीला धावत नाही की बँका कर्जात सवलत देत नाहीत. असं असलं तरी शेतमाल माफक किमतीत उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा असते. आता उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत मिळाली तर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार? पण याचं उत्तर शेतकऱ्यांच्या संपाला, मागण्यांना विरोध करणाऱ्यांकडे नाही. सरकारी बाबू, कॉर्पोरेट ऑफिसर, संघटित कामगार अशा सर्वांनाच वर्षाकाठी ठराविक इन्क्रिमेंट मिळत असते. दरवर्षी अशी वाढ होणे आवश्यकच असते, हे तुम्हाला मान्य असेलच. मग वाढत्या महागाईला अनुसरून शेतक-यांनीही शेतमालाच्या दरात वाढ करून मागितली तर त्यात गैर काय? त्यांना हमीभाव, खर्चानुसार उत्पादनाची वाढीव किंमत मिळायला नको का?