शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

म्हणून ‘भारत माता की जय’ म्हणतात - सरसंघचालक

By admin | Updated: June 9, 2016 22:00 IST

जगातील अनेक देशांना पितृत्वाच्या नजरेने तेथील लोक पाहतात. परंतु आपल्या देशात लोक देशाच्या भूमीला सर्वस्व मानतात. देश आणि जनता यांच्यात सूत्ररुप भावना असते. नियम कुठेही नाही.

ऑनलाइन लोकमत

नागपूर दि. ९ : जगातील अनेक देशांना पितृत्वाच्या नजरेने तेथील लोक पाहतात. परंतु आपल्या देशात लोक देशाच्या भूमीला सर्वस्व मानतात. देश आणि जनता यांच्यात सूत्ररुप भावना असते. नियम कुठेही नाही. पण लोक देशाला मातृस्थानी मानतात. मातृत्वाची ही भावना देशासोबत लोकांना एकत्र जोडते व यातूनच ‘भारत माता की जय’ असे म्हटल्या जाते, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले. संघ कुणाचा विरोध करत नाही. तसेच कुणाला प्रतिक्रिया म्हणूनदेखील संघ काम करत नाही. हिंदुत्व धर्म नव्हे तर संस्कृतीशी निगडीत आहे. म्हणूनच सर्व धर्माचे लोक येथे राहत असले तरी हा हिंदूंचा देश म्हटल्या जातो. समाजात एकात्मता वाढवून शोषणुक्त समाजाची निर्मिती करणे आवश्यक आहे, असेदेखील ते म्हणाले.

देशाचा विकास हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे. परंतु अनेकदा पात्रता नसलेल्या लहान लोकांचा अनावश्यक विरोध करण्यात येतो. या विरोधातूनच ते मोठे होतात. त्यामुळे टीका करणाºयांकडे दुर्लक्ष करायला हवे. गरजणारे कधीच बरसत नाही, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी संघ परिवारातील संस्थांना अशा वादांच्या वेळी शांत राहण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला. दादरी वाद, ‘जेएनयू’प्रकरण, कन्हैय्या वाद इत्यादींमध्ये संघ परिवारातील संस्थांकडून विरोध व प्रतिक्रिया देण्यात आली होती व प्रत्येक प्रकरणाची देशस्तरावर पेटले. यासंबंधात सरसंघचालकांनी परिवारातीलच संस्थांचे आपल्या भाषणातून कान टोचले.

संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा गुरुवारी सायंकाळी रेशीमबाग मैदान येथे समारोप झाला. याप्रसंगी कोलकाता येथील सुप्रसिद्ध स्तंभलेखक रंतिदेव सेनगुप्ता हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. देशासमोर आजच्या घडीला अनेक समस्या आहेत. या समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा त्यांचे उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. काही जणांकडून विरोध होतो व ते कार्य करण्यापेक्षा जोरजोराने बोलण्यातच धन्यता मानतात. अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे हिताचे असते. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात देशाबाबत प्रेम निर्माण करणे आवश्यक आहे. जोपर्यंत ही भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. शासनाच्या भरवशावर राहण्यापेक्षा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सामान्य मनुष्याला प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. लोकशक्तीच्या जागरणासाठी देशाच्या मूल्यांचे पुनर्जागरण करावे लागेल, असे डॉ.भागवत म्हणाले. 

चीन व पाकिस्तानपासून देशाला धोका आहे.या राष्ट्रविरोधी शक्तींना आता सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे. राष्ट्रभक्तींचा हुंकार देशभरात गुंजलाच पाहिजे, असे मत रंतिदेव सेनगुप्ता यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी एन.वन्नीराजन, महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यंदाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग १६ मे पासून सुरू झाला. या वर्गात देशभरातून १८ ते ४० वर्षे वयोगटातील ९७८ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांनी सुरुवातीला दंड, नियुद्ध, योगासन इत्यादींची विविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर घोष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. वर्गकार्यवाह हरीष कुळकर्णी यांनी प्रास्ताविकात वर्गाबाबत माहिती दिली.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे कौतुक

जगात भारताची प्रतिष्ठा वाढत आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये पंतप्रधानांनी सुंदर भाषण केले. लोक स्विकार करतील अशा शैलीत ते मुद्देसूद भाषण करतात. विशेष म्हणजे परखड मतदेखील व्यक्त करतात. अमेरिकेत असल्यामुळे तेथील लोक व विचारांचे महिमामंडन त्यांनी केले. परंतु अनावश्यक स्तुती मात्र टाळली, या शब्दांत सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.