शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

....म्हणून संतप्त नागरिकांनी लाईनमनचे अपहरण करुन बांधले

By admin | Updated: August 21, 2016 12:08 IST

समांतर जलवाहिनी कंपनीच्या दोन लाईनमनचे अपहरण करून चक्क वसाहतीत एक तास बांधून ठेवले. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. २१ : न्यू नंदनवन कॉलनी परिसरातील भूजबळनगर व परिसरातील वसाहतींना गुरूवारी पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील एका नगरसेविकेच्या पी.ए.ने समांतर जलवाहिनी कंपनीच्या दोन लाईनमनचे अपहरण करून चक्क वसाहतीत एक तास बांधून ठेवले. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

भूजबळनगर आणि परिसरातील वसाहतींना ज्युबलीपार्क येथील पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होतो. गुरूवारी पाणीपुरवठ्याचा दिवस होता. मात्र वसाहतींना पाणी मिळाले नाही. फारोळा येथून अत्यंत कमी दाबाने ज्युब्लीपार्कला पाणी आले. टाकीची लेव्हलपण कमी होती. त्यामुळे भूजबळनगरला पाणीपुरवठा होवू शकला नाही.

शनिवारी परत पाण्याचा दिवस होता. ज्यावेळी पाणी यायला हवे होते त्यावेळी आले नाही. त्यामुळे या वॉर्डातील नगरसेविकेच्या स्वीय साह्यकाने दुपारी २ वाजता थेट ज्युब्लिपार्क पाण्याची टाकी गाठली. टाकीवर शेख वसीम आणि सचिन वाणी हे दोन लाईनम सापडले. दोघांना स्वीय साह्याने पकडून नेले. थेट भूजबळनगर येथे नेवून एका विजेच्या खांबाला दोघांना बांधून टाकले. दोघांना बेदम मारहाण करण्याचा दमही भरण्यात आला. एक तास दोन्ही लाईनमनला बांधून ठेवले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

सायंकाळी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी स्वामी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघा लाईनमची साधी विचारपूसही केली नाही. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी पाणीपुरवठा न झाल्याने भूजबळनगर भागातील नागरिकांनी व नगरसेविकेने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला होता. कंपनीचा एकही अधिकारी उपलब्ध न झाल्याने राग अनावर झाला होता. मागील दोन महिन्यांपासून शहरतील अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसेवकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला तर एकही अधिकारी फोन उचलत नाही.