शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

....म्हणून संतप्त नागरिकांनी लाईनमनचे अपहरण करुन बांधले

By admin | Updated: August 21, 2016 12:08 IST

समांतर जलवाहिनी कंपनीच्या दोन लाईनमनचे अपहरण करून चक्क वसाहतीत एक तास बांधून ठेवले. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. २१ : न्यू नंदनवन कॉलनी परिसरातील भूजबळनगर व परिसरातील वसाहतींना गुरूवारी पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील एका नगरसेविकेच्या पी.ए.ने समांतर जलवाहिनी कंपनीच्या दोन लाईनमनचे अपहरण करून चक्क वसाहतीत एक तास बांधून ठेवले. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

भूजबळनगर आणि परिसरातील वसाहतींना ज्युबलीपार्क येथील पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होतो. गुरूवारी पाणीपुरवठ्याचा दिवस होता. मात्र वसाहतींना पाणी मिळाले नाही. फारोळा येथून अत्यंत कमी दाबाने ज्युब्लीपार्कला पाणी आले. टाकीची लेव्हलपण कमी होती. त्यामुळे भूजबळनगरला पाणीपुरवठा होवू शकला नाही.

शनिवारी परत पाण्याचा दिवस होता. ज्यावेळी पाणी यायला हवे होते त्यावेळी आले नाही. त्यामुळे या वॉर्डातील नगरसेविकेच्या स्वीय साह्यकाने दुपारी २ वाजता थेट ज्युब्लिपार्क पाण्याची टाकी गाठली. टाकीवर शेख वसीम आणि सचिन वाणी हे दोन लाईनम सापडले. दोघांना स्वीय साह्याने पकडून नेले. थेट भूजबळनगर येथे नेवून एका विजेच्या खांबाला दोघांना बांधून टाकले. दोघांना बेदम मारहाण करण्याचा दमही भरण्यात आला. एक तास दोन्ही लाईनमनला बांधून ठेवले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

सायंकाळी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी स्वामी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघा लाईनमची साधी विचारपूसही केली नाही. या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी पाणीपुरवठा न झाल्याने भूजबळनगर भागातील नागरिकांनी व नगरसेविकेने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला होता. कंपनीचा एकही अधिकारी उपलब्ध न झाल्याने राग अनावर झाला होता. मागील दोन महिन्यांपासून शहरतील अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसेवकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला तर एकही अधिकारी फोन उचलत नाही.