शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राला ठेंगा

By admin | Updated: May 24, 2016 14:30 IST

केंद्र सरकारनं स्मार्ट सिटी स्पर्धेतल्या दुसऱ्या फेरीतली शहरं जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकाही शहराचा समावेश नाहीये

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - केंद्र सरकारनं स्मार्ट सिटी स्पर्धेतल्या दुसऱ्या फेरीतली शहरं जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकाही शहराचा समावेश नाहीये. आज जाहीर करण्यात आलेली शहरे पुढीलप्रमाणे:
1. लखनौ (उत्तर प्रदेश) 2. भागलपूर (बिहार) 3. न्यू टाऊन कोलकाता (प. बंगाल)  4. फरीदाबाद (हरयाणा). 5. चंडीगढ (पंजाब, हरयाणा) 6. रायपूर (छत्तीसगढ) 7. रांची (झारखंड)  8. धरमसाला (हिमाचल प्रदेश) 9. वारांगल (तेलंगणा) 10. पणजी (गोवा)  11. आगरतळा (त्रिपुरा) 12. इंफाळ (मणीपूर)  13. पोर्ट ब्लेअर (अंदमान निकोबार) 
 
 
पहिल्या फेरीमध्ये स्थान मिळालेल्या राज्यांचा समावेश दुसऱ्या फेरीत झाल्याचे बघायला मिळत आहे. बिहार व पश्चिम बंगालला पहिल्या फेरीत स्थान मिळालेले नव्हते. ते आता मिळाले आहे. विशेष म्हणजे या शहरांपैकी तीन शहरे काँग्रेसशासित राज्यांमध्ये आहेत, ती म्हणजे मणीपूर, मिझोराम व उत्तराखंड.
याखेरीज बिहारमध्ये जनता दलाचे सरकार आहे, उत्तर प्रदेश (समाजवादी पार्टी), तेलंगणा (राष्ट्र समिती) या ठिकाणीही भाजपाची सत्ता नाही. पहिल्या फेरीतल्या 20 शहरांपैकी 13 शहरे अशी होती, ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. मात्र दुसऱ्या फेरीत ही कसर भरून काढण्यात आली असून भाजपाचे राज्य नसलेल्या राज्यांमधल्या शहरांना निवडण्यात आल्याचे दिसत आहे. 
 
स्मार्ट सिटी म्हणजे काय?
 
- पाणी आणि विजेचा खात्रीशीर पुरवठा.
- मलनि:स्सारण व घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा.
- कार्यक्षम नागरी दळण वळण व्यवस्था.
- आयटी कनेक्टिव्हिटी.
- ई-गव्हर्नन्स आणि लोकांचा प्रशासनामध्ये सहभाग.
 
स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये वरील उपाय योजना मुख्य आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 2019 - 20 पर्यंत देशभरात 100 शहरे विकसित करण्यात येणार आहेत. या पाच वर्षांमध्ये केंद्र सरकार त्यासाठी 48 हजार कोटी रुपयांचे वित्तसहाय्य करणार आहे. 
 
2015 - 16 मध्ये 20 शहरांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात आली. 2016 - 17 मध्ये 40 शहरांची तर 2017 - 18 मध्ये उरलेल्या 40 शहरांची निवड करण्याची योजना आहे. निवड झालेल्या प्रत्येक शहराला पहिल्या वर्षी 200 कोटी रुपये, तर नंतरच्या प्रत्येक वर्षी 100 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. राज्य सरकार व संबंधित स्थानिक प्रशासन तितक्याच रकमेची भर या प्रकल्पासाठी खर्च करतिल अशी अपेक्षा आहे.