शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

पाणीबचतीसाठी छोटे; पण प्रभावी उपाय

By admin | Updated: May 18, 2016 05:17 IST

लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन पाणी वाचविण्यासाठी राज्यभरातील घराघरांमध्ये आता छोट्या-छोट्या; पण प्रभावी उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

मुंबई : ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन पाणी वाचविण्यासाठी राज्यभरातील घराघरांमध्ये आता छोट्या-छोट्या; पण प्रभावी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. नागरिक आता उत्स्फूर्तपणे या उपायांची माहिती आपल्या परिसरातील रहिवाशांना सांगताना दिसून येत आहेत.कोल्हापुरातील बेलबाग (मंगळवार पेठ) येथील सुलोचना आदिनाथ जाधव यांनी संक्रांतीतील सुगडींचा (खण) वापर करून त्यांनी ठिबक पद्धतीने पाणी देऊन झाडे जगविली आहेत. त्यांचा हा प्रयत्न छोटासा असला, तरी सहजपणे पाणी बचत करण्याचा संदेश देणारा आहे. शांतिनिकेतन अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या जाधव यांनी त्यांच्या फ्लॅटच्या प्रवेशद्वार, खिडक्यांमध्ये गोकर्ण, वड, लिंबू, ब्रह्मकमळ, कढीपत्ता, बेल, तुळस अशी विविध स्वरूपातील २0 झाडे कुंड्यांमध्ये लावली आहेत. या झाडांना पाणी देण्यासाठी प्रत्येक कुंडीमध्ये त्यांनी एक सुगडी ठेवून त्याला छोटे छिद्र पाडले आहे. एका सुगडीतील पाणी दिवसभर झाडांना पुरते. यासाठी त्या देवपूजेचे पाणी वापरतात. सुगडींचा वापर न केल्यास, या झाडांसाठी साधारणत: एक मोठी बादली पाणी द्यावे लागले असते, पण सुगडींचा वापर केल्याने दोन-तीन तांब्या पाणी पुरेसे होत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या पाणीबचतीचा अशा स्वरूपातील प्रयत्न करीत आहेत.सोलापुरातील होटगी रस्त्यावर राहणारे बी. एन. वेल्हाळ यांनी जलबचतीसाठी व्यक्तिगत प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘जलमित्र अभियानासंदर्भात ‘लोकमत’कडून विविध उपक्रम घेतले जात आहेत. त्या संदर्भातील वृत्त वाचून मी स्वत: पाणी वाचविण्यासाठी जनजागरण करीत आहे.’ सोलापुरात पाच दिवसांतून एकदा पाणी येते. पाणी आल्यानंतर शिळे झालेले पाणी ओतून देण्याकडे महिलांचा कल असतो. या वेळी वेल्हाळ हे आपल्या परिसरात फिरून पाणी न ओतण्याबाबत आवाहन करतात. स्वत:च्या घरातील चार-पाच दिवसांपूर्वीचे पाणी ते परात आणि पसरट भांड्यांमध्ये एकत्र करून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी घराच्या गच्चीवर किंवा अंगणात ठेवतात. भवानी पेठेतील सुलक्षणा पाटील यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून सांगितले की, ‘आम्ही स्टीलचे ताट-वाटी न वापरता, ‘यूज अँड थ्रो’ पत्रावळ्यांचा वापर करीत आहोत,’ असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)