शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

पाणीबचतीसाठी छोटे; पण प्रभावी उपाय

By admin | Updated: May 18, 2016 05:17 IST

लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन पाणी वाचविण्यासाठी राज्यभरातील घराघरांमध्ये आता छोट्या-छोट्या; पण प्रभावी उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

मुंबई : ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन पाणी वाचविण्यासाठी राज्यभरातील घराघरांमध्ये आता छोट्या-छोट्या; पण प्रभावी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. नागरिक आता उत्स्फूर्तपणे या उपायांची माहिती आपल्या परिसरातील रहिवाशांना सांगताना दिसून येत आहेत.कोल्हापुरातील बेलबाग (मंगळवार पेठ) येथील सुलोचना आदिनाथ जाधव यांनी संक्रांतीतील सुगडींचा (खण) वापर करून त्यांनी ठिबक पद्धतीने पाणी देऊन झाडे जगविली आहेत. त्यांचा हा प्रयत्न छोटासा असला, तरी सहजपणे पाणी बचत करण्याचा संदेश देणारा आहे. शांतिनिकेतन अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या जाधव यांनी त्यांच्या फ्लॅटच्या प्रवेशद्वार, खिडक्यांमध्ये गोकर्ण, वड, लिंबू, ब्रह्मकमळ, कढीपत्ता, बेल, तुळस अशी विविध स्वरूपातील २0 झाडे कुंड्यांमध्ये लावली आहेत. या झाडांना पाणी देण्यासाठी प्रत्येक कुंडीमध्ये त्यांनी एक सुगडी ठेवून त्याला छोटे छिद्र पाडले आहे. एका सुगडीतील पाणी दिवसभर झाडांना पुरते. यासाठी त्या देवपूजेचे पाणी वापरतात. सुगडींचा वापर न केल्यास, या झाडांसाठी साधारणत: एक मोठी बादली पाणी द्यावे लागले असते, पण सुगडींचा वापर केल्याने दोन-तीन तांब्या पाणी पुरेसे होत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या पाणीबचतीचा अशा स्वरूपातील प्रयत्न करीत आहेत.सोलापुरातील होटगी रस्त्यावर राहणारे बी. एन. वेल्हाळ यांनी जलबचतीसाठी व्यक्तिगत प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘जलमित्र अभियानासंदर्भात ‘लोकमत’कडून विविध उपक्रम घेतले जात आहेत. त्या संदर्भातील वृत्त वाचून मी स्वत: पाणी वाचविण्यासाठी जनजागरण करीत आहे.’ सोलापुरात पाच दिवसांतून एकदा पाणी येते. पाणी आल्यानंतर शिळे झालेले पाणी ओतून देण्याकडे महिलांचा कल असतो. या वेळी वेल्हाळ हे आपल्या परिसरात फिरून पाणी न ओतण्याबाबत आवाहन करतात. स्वत:च्या घरातील चार-पाच दिवसांपूर्वीचे पाणी ते परात आणि पसरट भांड्यांमध्ये एकत्र करून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी घराच्या गच्चीवर किंवा अंगणात ठेवतात. भवानी पेठेतील सुलक्षणा पाटील यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून सांगितले की, ‘आम्ही स्टीलचे ताट-वाटी न वापरता, ‘यूज अँड थ्रो’ पत्रावळ्यांचा वापर करीत आहोत,’ असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)