शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

सोने लुटण्याचा दिन..

By admin | Updated: October 3, 2014 00:29 IST

वरतंतू नावाचे एक गुरू होते. ते आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत असत. अनेक शिष्य त्यांच्याकडून वेद आणि शास्त्रचा अभ्यास करत असत.

वरतंतू नावाचे एक गुरू होते. ते आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत असत. अनेक शिष्य त्यांच्याकडून वेद आणि शास्त्रचा अभ्यास करत असत. एकादा असेच वरतंतू यांच्याकडे त्यांच्या एका कौत्स नामक शिष्याने त्यांना विचारले की,  ‘तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय गुरु दक्षिणा द्यावी.’ यावर गुरु वरतंतू म्हणाले की,  ‘कौत्स, ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा कधीच सौदा करावयाचा नसतो. तुम्हाला ज्ञान मिळाले यातच माझी गुरुदक्षिणा आली.’ मात्र कौत्साचे समाधान झाले नाही.  ‘मी काय गुरु दक्षिणा देवू..’ असे तो विचारु लागला.
गुरु यावर म्हणाले,  ‘मी तुला चौदा विद्यांचे शिक्षण दिले म्हणून तु मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.’ कौत्स याला वाटले की आपण सहज एवढया मोहरा कमवू. परंतू त्याला ते जमले नाही. कौत्स यावर रघुराजाकडे गेला. त्याने त्यांच्याकडे मोहरांची मागणी केली. पण राजाने त्यापूर्वीच आपली सगळी संपत्ती दान केली होती. पण आता कौत्सला रिकम्या हाताने परत कसे पाठावयाचे म्हणून त्याने त्याला तीन दिवसांनी येण्यास सांगितले. शिवाय राजानेही कुबेराकडे वसुलीसाठी निरोप धाडला. पण धन काही येईना. मग राजाने अखेर युद्धाची तयारी केली. आणि ही युद्धाची बातमी इंद्र देवाला कळाली. इंद्राने यावर कुबेराला राजाच्या नगरीच्या वेशीवर जी आपटयाची वृक्ष आहेत; त्यावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. दुस:या दिवशी राजाने तेथे सुवर्णमुद्रांचा ढिग जमा झाल्याचे पाहिले आणि कौत्साला ते धन घेण्यास सांगितले. त्यानेही गुरुदक्षिणोएवढेच धन घेतले. आणि राजाने उर्वरित मुद्रा प्रजेला वाटल्या. प्रजेला ज्या दिवशी आपटयाच्या झाडाखाली जे धन मिळाले तो दिवस दस:याचा होता. त्याची आठवण म्हणून आपटयाच्या पानाला त्या दिवशी सोने म्हणून देतात आणि घेतात. शिवाय या दिवशी शस्त्रंची पूजा देखील केली जाते.
देवीने महिषासुराशी युद्ध केले आणि त्याला मारले तो दिवस म्हणजे दसरा. प्रभू रामाने रावणाचा वध केला तो दिवस म्हणजे दसरा. राजपूत असोत वा मराठे असोत; या वीरांनी युद्ध मोहीमांना प्रारंभ केला तो दिवस म्हणजे दसरा. दस:याची दुसरी ओळख म्हणजे विजयादशमी अशी आहे. अज्ञानाने ज्ञानावर, पराक्रमाने शत्रुवर आणि वै:यावर प्रेमाने विजय मिळविण्याचा दिवस म्हणजे दसरा. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून दस:याला स्थान आहे. या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे करार शिवाय नव्या योजनांचा आरंभ केला जातो. शिवाय सायंकाळी आपटयाची पाने सोने म्हणून लहानग्यांकडून मोठयांना दिली जातात. थोरामोठयांना त्यांचा मान दिला जातो. त्यांच्या पाया पडले जाते ते यादिवशी. पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्यांचे आशीवार्द घेतले जातात ते दस:यादिवशी. म्हणून दस:याला फार मोठे महत्व आहे.
 
दसरा या शब्दाचा अर्थ दहावा दिवस असा आहे. नवरात्रदरम्यान घटाच्या आजूबाजूला पेरलेले धान्य उपटून देवीसह सह इतर देवांना वाहतात. शिवाय गवळी किंवा इतर समाजाचे लोक या दिवशी कालिया नागावर बसलेल्या कृष्णाची पूजा करतात. त्याला शिलांगणाचा उत्सव असेही म्हटले जाते. शिलांगणाच्या पागोटय़ामध्ये धान्याच्या रोपांचा ङोंडा लावला जातो. शिलांगण हा सीमोल्लंघन हा शब्दाचा अपभ्रंश आहे. या दिवशी शमीची पूजा केली जाते. शिवाय त्यानंतर शमीची फांदी तोडून तिची पाने, तिळाच्या झाडाची फुले, बाजारीची पाने आणि आपटयाची पाने श्रीगणोशाला अर्पण केली जातात. आणि त्यानंतर ही पाने गावाबाहेर नेली जातात व लुटली जातात; यालाच सीमोल्लंघन असे म्हणतात.
 
सचिन लुंगसे