शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
2
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
5
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
6
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
7
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
8
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
9
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
10
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
11
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
12
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
13
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
14
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
15
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
16
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
17
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
18
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
19
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
20
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी

मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल वृद्ध पालकांच्या भरपाईला कात्री

By admin | Updated: November 10, 2015 02:10 IST

भिवंडीजवळील कोन गावातील एका वृद्ध दाम्पत्यास त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल ठाण्याच्या मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने मंजूर

मुंबई : भिवंडीजवळील कोन गावातील एका वृद्ध दाम्पत्यास त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल ठाण्याच्या मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने मंजूर केलेल्या भरपाईत उच्च न्यायालयाने अपिलात ३५ लाखांची कपात करून या दाम्पत्यास २६ लाख ४५ हजार रुपयांची सुधारित भरपाई मंजूर केली आहे.न्यायाधिकरणाने मयताचे अपघताच्या वेळचे वय आणि त्याचे भविष्यातील संभाव्य उत्पन्न यांच्या गुणोत्तरावर भरपाईची रक्कम ठरवून चूक केली. त्याऐवजी मयतच्या पालकांचे अपघाताच्या वेळचे वय गृहीत धरून भरपाई काढायला हवी होेती, असे नमूद करून न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने भरपाईचा फेरहिशेब केला. न्यायाधिकरणाने ६१ लाख ५५ हजार भरपाई मंजूर केली होती. उच्च न्यायालयाने ती कमी करून २६ लाख ४५ हजार रुपये केली.ज्या ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने या दाम्पत्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता तो ट्रक अजमेर येथील कमरुद्दीन एस. खान यांच्या मालकीचा होता. भरपाई दाव्यात ट्रकचालक हजर न झाल्याने ट्रकचा विमा उतरविणाऱ्या न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीनेच दाव्यात प्रतिवाद केला होता. विमा कंपनीनेच केलेले अपील मंजूर करून उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम कमी केली. भरपाईच्या या रकमेवर दावा दाखल केल्यापासून म्हणजे २००९ पासून ९ टक्के दराने व्याजही द्यावे लागेल. भरपाईपैकी काही रक्कम या दाम्पत्यास रोख मिळेल व बाकीची रक्कम त्यांच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाईल. रामराव लाला बोरसे व सुशिला असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते कल्याण-भिवंडी रस्त्यावरील कोन गावात नाईकवाडीत राहतात. गावातील काही मंडळींसोबत त्यांच्या २९ वर्षांचा मुलगा खासगी बसने एका लग्नासाठी अमळनेर येथे गेला होता. तेथून परत येत असताना १९ फेब्रुवारी २००६ रोजी समोरून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या दीपकचे नंतर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते. दीपक भिवंडी येथे शिशुविहार एज्यु. सोसायटीतर्फे दादासाहेब दांडेकर विद्यालयात इंग्रजीचा शिक्षक म्हणून हंगामी नोकरीस होता. अकाली मृत्यू झाला नसता तर दीपक नोकरीत कायम झाला असता व त्याला सहाव्या वेतन आयोगानुसार दरमहा ४० हजार रुपये पगार मिळाला असता. कायद्यानुसार या हिशेबाने मिळणारे ५० टक्के भावी उत्पन्न खंडपीठाने भरपाईसाठी गृहित धरले. तसेच मुलाच्या अपघाती मृत्यूच्या वेळी आई-वडिलांचे सरकारी वय ६१ वर्षे होते. म्हणजेच किमान सात वर्षे त्यांना मुलाचा आधार मिळाला असे मानून ५० टक्के भावी उत्पन्नाला सातने गुणून भरपाईची रक्कम ठरविली. न्यायाधिकरणाने दीपकचे वय हा आधार मानला होता व तो आणखी १७ वर्षे नोकरी करू शकला असता असे गृहित धरून १७ने गुणून भरपाई ठरविली होती. (विशेष प्रतिनिधी)