शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल वृद्ध पालकांच्या भरपाईला कात्री

By admin | Updated: November 10, 2015 02:10 IST

भिवंडीजवळील कोन गावातील एका वृद्ध दाम्पत्यास त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल ठाण्याच्या मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने मंजूर

मुंबई : भिवंडीजवळील कोन गावातील एका वृद्ध दाम्पत्यास त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल ठाण्याच्या मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने मंजूर केलेल्या भरपाईत उच्च न्यायालयाने अपिलात ३५ लाखांची कपात करून या दाम्पत्यास २६ लाख ४५ हजार रुपयांची सुधारित भरपाई मंजूर केली आहे.न्यायाधिकरणाने मयताचे अपघताच्या वेळचे वय आणि त्याचे भविष्यातील संभाव्य उत्पन्न यांच्या गुणोत्तरावर भरपाईची रक्कम ठरवून चूक केली. त्याऐवजी मयतच्या पालकांचे अपघाताच्या वेळचे वय गृहीत धरून भरपाई काढायला हवी होेती, असे नमूद करून न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने भरपाईचा फेरहिशेब केला. न्यायाधिकरणाने ६१ लाख ५५ हजार भरपाई मंजूर केली होती. उच्च न्यायालयाने ती कमी करून २६ लाख ४५ हजार रुपये केली.ज्या ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने या दाम्पत्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता तो ट्रक अजमेर येथील कमरुद्दीन एस. खान यांच्या मालकीचा होता. भरपाई दाव्यात ट्रकचालक हजर न झाल्याने ट्रकचा विमा उतरविणाऱ्या न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीनेच दाव्यात प्रतिवाद केला होता. विमा कंपनीनेच केलेले अपील मंजूर करून उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम कमी केली. भरपाईच्या या रकमेवर दावा दाखल केल्यापासून म्हणजे २००९ पासून ९ टक्के दराने व्याजही द्यावे लागेल. भरपाईपैकी काही रक्कम या दाम्पत्यास रोख मिळेल व बाकीची रक्कम त्यांच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाईल. रामराव लाला बोरसे व सुशिला असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते कल्याण-भिवंडी रस्त्यावरील कोन गावात नाईकवाडीत राहतात. गावातील काही मंडळींसोबत त्यांच्या २९ वर्षांचा मुलगा खासगी बसने एका लग्नासाठी अमळनेर येथे गेला होता. तेथून परत येत असताना १९ फेब्रुवारी २००६ रोजी समोरून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या दीपकचे नंतर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते. दीपक भिवंडी येथे शिशुविहार एज्यु. सोसायटीतर्फे दादासाहेब दांडेकर विद्यालयात इंग्रजीचा शिक्षक म्हणून हंगामी नोकरीस होता. अकाली मृत्यू झाला नसता तर दीपक नोकरीत कायम झाला असता व त्याला सहाव्या वेतन आयोगानुसार दरमहा ४० हजार रुपये पगार मिळाला असता. कायद्यानुसार या हिशेबाने मिळणारे ५० टक्के भावी उत्पन्न खंडपीठाने भरपाईसाठी गृहित धरले. तसेच मुलाच्या अपघाती मृत्यूच्या वेळी आई-वडिलांचे सरकारी वय ६१ वर्षे होते. म्हणजेच किमान सात वर्षे त्यांना मुलाचा आधार मिळाला असे मानून ५० टक्के भावी उत्पन्नाला सातने गुणून भरपाईची रक्कम ठरविली. न्यायाधिकरणाने दीपकचे वय हा आधार मानला होता व तो आणखी १७ वर्षे नोकरी करू शकला असता असे गृहित धरून १७ने गुणून भरपाई ठरविली होती. (विशेष प्रतिनिधी)