शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अवकाळीचे सहा बळी!

By admin | Updated: May 12, 2016 03:46 IST

अवकाळी पावसाने बुधवारी राज्यात सहा बळी घेतले. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यालाही पावसाने तडाखा दिला, त्यात पिकांचे नुकसान झाले.

मुंबई : अवकाळी पावसाने बुधवारी राज्यात सहा बळी घेतले. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यालाही पावसाने तडाखा दिला, त्यात पिकांचे नुकसान झाले. पुणे, सांगली, सातारा, नाशिक, नगर, बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस झाला. लातूर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्णाला बुधवारी पावसाने झोडपले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील म्हसला शिवारात दुपारी वीज पडून अंकुश भीमराव पतंगे हे ठार झाले. बीडमध्ये केज येथे शेख सुरय्या शेख आयुब (४५) यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. उस्मानाबाद जिल्ह्णातील आंदोरा (ता. कळंब) तसेच सोनारी ( ता. परंडा) परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. आंदोऱ्यात वादळी वाऱ्यात अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले. कळंब रोडवरील नजीर पठाण यांची सहा एकरवरील केळी बाग उद्ध्वस्त झाली. कळंब-बार्शी राज्य मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने राज्य मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती.नाशिकमधील कळवण तालुक्यातील भेंडी फाटा येथे वीज पडून वाजगाव येथील शेतमजूर पांडुरंग सुखदेव कुंवर यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात खिरविरे शिवारात वीज पडून वाळीबा विठ्ठल साबळे (२८) या तरुणाचा मृत्यू झाला. साबळे यांचा दोन वर्षाचा मुलगा जखमी झाला. वाळीबा यांच्या पत्नीने भर पावसात अर्धा किलोमीटरवरील खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलाला नेले. तेथे त्यास योग्य उपचार मिळाले नाहीत. वाहन चालक नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाही उपलब्ध होऊ शकली नाही. नंतर १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेतून वाळीबा व जखमी मुलास अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी सायंकाळी खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकले.मौजे उकळी येथे अंगावर वीज कोसळून दोन जण जखमी झाले. सातारा शहरासह वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांमध्ये बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सेवागिरी देवस्थानने येरळा पुलालगत नवीन बंधारा बांधला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)