शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचे सहा बळी!

By admin | Updated: May 12, 2016 03:46 IST

अवकाळी पावसाने बुधवारी राज्यात सहा बळी घेतले. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यालाही पावसाने तडाखा दिला, त्यात पिकांचे नुकसान झाले.

मुंबई : अवकाळी पावसाने बुधवारी राज्यात सहा बळी घेतले. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यालाही पावसाने तडाखा दिला, त्यात पिकांचे नुकसान झाले. पुणे, सांगली, सातारा, नाशिक, नगर, बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस झाला. लातूर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्णाला बुधवारी पावसाने झोडपले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील म्हसला शिवारात दुपारी वीज पडून अंकुश भीमराव पतंगे हे ठार झाले. बीडमध्ये केज येथे शेख सुरय्या शेख आयुब (४५) यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. उस्मानाबाद जिल्ह्णातील आंदोरा (ता. कळंब) तसेच सोनारी ( ता. परंडा) परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. आंदोऱ्यात वादळी वाऱ्यात अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले. कळंब रोडवरील नजीर पठाण यांची सहा एकरवरील केळी बाग उद्ध्वस्त झाली. कळंब-बार्शी राज्य मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने राज्य मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती.नाशिकमधील कळवण तालुक्यातील भेंडी फाटा येथे वीज पडून वाजगाव येथील शेतमजूर पांडुरंग सुखदेव कुंवर यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात खिरविरे शिवारात वीज पडून वाळीबा विठ्ठल साबळे (२८) या तरुणाचा मृत्यू झाला. साबळे यांचा दोन वर्षाचा मुलगा जखमी झाला. वाळीबा यांच्या पत्नीने भर पावसात अर्धा किलोमीटरवरील खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलाला नेले. तेथे त्यास योग्य उपचार मिळाले नाहीत. वाहन चालक नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाही उपलब्ध होऊ शकली नाही. नंतर १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेतून वाळीबा व जखमी मुलास अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी सायंकाळी खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकले.मौजे उकळी येथे अंगावर वीज कोसळून दोन जण जखमी झाले. सातारा शहरासह वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांमध्ये बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सेवागिरी देवस्थानने येरळा पुलालगत नवीन बंधारा बांधला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)