शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचे सहा बळी!

By admin | Updated: May 12, 2016 03:46 IST

अवकाळी पावसाने बुधवारी राज्यात सहा बळी घेतले. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यालाही पावसाने तडाखा दिला, त्यात पिकांचे नुकसान झाले.

मुंबई : अवकाळी पावसाने बुधवारी राज्यात सहा बळी घेतले. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यालाही पावसाने तडाखा दिला, त्यात पिकांचे नुकसान झाले. पुणे, सांगली, सातारा, नाशिक, नगर, बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस झाला. लातूर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्णाला बुधवारी पावसाने झोडपले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील म्हसला शिवारात दुपारी वीज पडून अंकुश भीमराव पतंगे हे ठार झाले. बीडमध्ये केज येथे शेख सुरय्या शेख आयुब (४५) यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. उस्मानाबाद जिल्ह्णातील आंदोरा (ता. कळंब) तसेच सोनारी ( ता. परंडा) परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. आंदोऱ्यात वादळी वाऱ्यात अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले. कळंब रोडवरील नजीर पठाण यांची सहा एकरवरील केळी बाग उद्ध्वस्त झाली. कळंब-बार्शी राज्य मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने राज्य मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती.नाशिकमधील कळवण तालुक्यातील भेंडी फाटा येथे वीज पडून वाजगाव येथील शेतमजूर पांडुरंग सुखदेव कुंवर यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात खिरविरे शिवारात वीज पडून वाळीबा विठ्ठल साबळे (२८) या तरुणाचा मृत्यू झाला. साबळे यांचा दोन वर्षाचा मुलगा जखमी झाला. वाळीबा यांच्या पत्नीने भर पावसात अर्धा किलोमीटरवरील खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलाला नेले. तेथे त्यास योग्य उपचार मिळाले नाहीत. वाहन चालक नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाही उपलब्ध होऊ शकली नाही. नंतर १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेतून वाळीबा व जखमी मुलास अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी सायंकाळी खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकले.मौजे उकळी येथे अंगावर वीज कोसळून दोन जण जखमी झाले. सातारा शहरासह वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांमध्ये बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सेवागिरी देवस्थानने येरळा पुलालगत नवीन बंधारा बांधला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)