शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार वीज कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीच्या वाटेवर

By admin | Updated: August 27, 2014 00:54 IST

शासनाच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वीज कंपन्यांमधील तब्बल सहा हजार कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केले. मात्र हा वाढता ओघ पाहून धास्तावलेल्या शासनाने अवघ्या वीसच दिवसात

२० दिवसात आदेश फिरविला : संपाची नोटीसविलास गावंडे - यवतमाळशासनाच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वीज कंपन्यांमधील तब्बल सहा हजार कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केले. मात्र हा वाढता ओघ पाहून धास्तावलेल्या शासनाने अवघ्या वीसच दिवसात ही योजना गुंडाळली. त्यासह इतर प्रश्नांना घेऊन आता राज्यभरातील ८३ हजार अभियंते-कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तयारी चालविली आहे. विद्युत वितरण कंपनीत सेवेची ४५ वर्षे पूर्ण किंवा सेवेला दोन वर्ष शिल्लक राहिलेल्या वर्ग तीन व चारमधील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती. योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्याला सरासरी दहा लाख रुपये मिळणार होते. शिवाय पाल्यास सेवेत घेण्याचाही पर्याय ठेवण्यात आला होता. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ आॅगस्ट ठरविण्यात आली होती. वसुली, साहित्याचा तुटवडा, कालबाह्य झालेली वीज लाईन, चुकीच्या बिलामुळे वसुलीसाठी होणारा मानसिक त्रास, वरिष्ठांकडून जलद गतीने कामे होण्याचा तगादा आदी कारणांमुळे हजारो कर्मचाऱ्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला. योजना जाहीर झाल्यापासून केवळ २० दिवसात कंपनीत कार्यरत ६० हजार कर्मचाऱ्यांपैकी सहा हजारावर कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केले. यात दोन वर्ष शिल्लक राहिलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती. शिवाय वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या वीज कामगारांचाही समावेश आहे. तसेच प्रशासनातील कामकाज सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही अर्ज दाखल केले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ दिल्यास कंपनीवर आर्थिक भार पडेल. शिवाय कामकाजात प्रचंड अडथळे निर्माण होतील, या धास्तीने सदर योजनेला स्थगिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, सदर योजने संदर्भातील सुधारित आदेश काढण्याचे संकेतही महावितरण कंपनीने दिले असल्याचे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे झोन उपाध्यक्ष प्रभाकर कळंबे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.औरंगाबाद बैठकीत कामगारांच्या प्रश्नांवर उहापोहविद्युत कंपनीतील कामगारांच्या प्रमुख संघटनांची बैठक सोमवारी औरंगाबाद येथे झाली. कराराचा भंग करून दिलेली वेतनवाढ यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने रिक्त जागा भराव्या, शिवाय या जागांवर कंपनीत कार्यरत कर्मचाऱ्यांनाच पदोन्नतीने नियुक्ती द्यावी, अशी मागणी रेटण्यात आली. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या एकतर्फी आणि दडपशाहीच्या धोरणाला विरोध करण्यात आला. जलविद्युत केंद्र विद्युत कंपनीने चालवावे, ही बाब प्रामुख्याने मांडण्यात आली. पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. स्वेच्छानिवृत्ती योजनेवरही या बैठकीत चर्चा झाली. कंपनीतील सात संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. २१ दिवसात प्रश्न निकाली न निघाल्यास २४ तासांच्या संपाची नोटीस व्यवस्थापनाला देण्यात आली. यात तीनही कंपन्यातील सुमारे ८३ हजार कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे उपसरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.