शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

मराठवाड्यात वीज पडून सहा ठार

By admin | Updated: June 4, 2016 03:27 IST

बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली

औरंगाबाद : बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विविध ठिकाणी वीज कोसळून सहा जणांसह सहा शेळ्या व दोन म्हशी दगावल्या तर चार जण जखमी झाले. बीड शहरासह तालुक्यातील केतूरा, लिंबा रूई भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान घरावरील पत्रे उडून गेले. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे सायंकाळी ५ वाजता पावसाला सुरुवात झाली. धारूर तालुक्यातील आसरडोह (जि.बीड) येथील अर्जुन सखाराम काळे (५३) हे शेतामध्ये बेलाची पाने आणण्यासाठी गेले होते. यावेळी वीज कोसळली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील दत्तनगर भागात बाभळीच्या झाडावर वीज कोसळल्याने शेतकरी बळीराम देवीदास शिंदे यांच्या झाडाखाली बांधलेल्या दोन म्हशी जागीच दगावल्या. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे वादळीवाऱ्यामुळे घराच्या पत्र्यावरील दगड डोक्यात पडल्याने महिलेचा तर आर्वी येथील ३२ वर्षीय अशोक रामराव कदम शेतकऱ्याचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला.उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब व वाशी तालुका व परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला़ ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती़ तर कळंब तालुक्यातील नायगाव शिवारात वीज पडल्याने सुब्राव माने व पापा शेख यांच्या सहा शेळ्या ठार झाल्या़ तर बाळू वामन मोटे (४५) या मेंढपाळाचा मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)