शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे हाल कायम; राज्याचा पैसा गेला कुठे?

By admin | Updated: June 8, 2014 00:09 IST

वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला खडसे यांनी आज सुरुवात केली.

गरिबांचे हाल कायम; राज्याचा पैसा गेला कुठे?-खडसे यांचा सवालमुंबई - आदिवासी, शेतकरी, मागासवर्गीयांची दुरावस्था तशीच कायम आहे मग राज्याचे उत्पन्न, कर्जाऊ घेतलेली अब्जावधीची रक्कम जिरली कुठे, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला. वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला खडसे यांनी आज सुरुवात केली. राज्य कर्जावरील व्याजापोटी दर महिन्याला ३ हजार कोटी रुपये भरत आहे. अब्जावधी रुये खर्चून नेमके किती सिंचन झाले याची माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिली जात नाही. सिंचनात गैरव्यवहार झाल्याचे मान्य करणारे मुख्यमंत्री राजकीय गरज म्हणून राष्ट्रवादीच्या शेजारी बसतात, अशी टीका त्यांनी केली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटलांनी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. सीसीटीव्ही बसवू, फोर्स वन निर्माण करु, सागरी सुविधा बळकट करु, पोलिस भरती करु, बुलेटप्रुफ जॅकेट घेऊ. एकाचाही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसला नाही. आबांच्या घोषणांचे काय झाले? राज्यात दलित, महिला कुणीही सुरक्षित नाही, असे ते म्हणाले. राज्यावरील संकट दूर करण्यासाठी आकस्मिक निधी असतो पण सरकार तो स्मारके, मंत्र्यांच्या गाड्या अन् बंगल्यांवर खर्च करीत असल्याचेही ते म्हणाले. अर्थसंकल्पावरील चर्चेत सुभाष देसाई, गणपतराव देशमुख, मीनाक्षी पाटील, अनिल बोंडे, अबू आझमी, सुरेश हळवणकर, अमीन पटेल, प्रवीण दरेकर, रवींद्र वायकर आदी सदस्यांनी भाग घेतला.(विशेष प्रतिनिधी)फुटाणे खाण्याची वेळ येईलमहागाई कमी करण्याचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिलेली नाही. आणि तंबाखू, चुरमुरे, फुटाणे यासारख्या वस्तूंवर करमुक्ती दिली. खा तंबाखू, लावा चूना. पण आता तुमच्यावरच फुटाणे खाण्याची वेळ हीच जनता आणेल. राज्य चार महिन्यांत भारनियमनमुक्त करण्याच्या १५ वर्षांपूर्वीच्या घोषणेचे काय झाले? दादा क्या हुआ तेरा वादा, असे बोल खडसे यांनी सुनावले.