शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

वसतिगृहातील जेवणात आढळली पाल

By admin | Updated: February 13, 2017 03:55 IST

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचे चेंबूर नाका येथे ‘संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह’ आहे. या वसतिगृहात रविवारी दुपारच्या जेवणात पाल आढळल्याने एकच खळबळ

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचे चेंबूर नाका येथे ‘संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह’ आहे. या वसतिगृहात रविवारी दुपारच्या जेवणात पाल आढळल्याने एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांनी जेवणाची सुरुवात करण्याआधीच हा प्रकार उघडकीस आल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्यावर होणारा विपरित परिणाम टळल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. राज्यातील विविध भागातून मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह आहे. या वसतिगृहात सध्या एकूण १२० विद्यार्थी राहात आहेत. यामध्ये २० अंध आणि अपंग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रविवारी वसतिगृहात मांसाहारी जेवण असते. ठरल्याप्रमाणे आजही मासांहारी जेवण होते. उद्या परीक्षा असल्यामुळे या वसतिगृहात राहणारा विद्यार्थी राहुल जांबूळकर जेवायला लवकर गेला. सगळ््यात आधी हजेरी लावलेल्या राहुलने जेवण ताटात वाढून घेतल्यावर जेवणाची सुरुवात करण्याआधीच त्याच्या जेवणात पाल असल्याचे त्याला आढळले. त्याने तत्काळ ही माहिती अन्य विद्यार्थ्यांना दिली आणि वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती कळवली. वसतिगृहातील जेवणात पाल आढळल्याचे कळल्यावरही ठेकेदार संध्याकाळी वसतिगृहात दाखल झाला नव्हता. वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत पाहणी केली. या पाहणीनंतर विद्यार्थ्यांना कारवाईचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यापूर्वीदेखील जेवणात अनेकदा काचा, खडे, माती आढळली आहे. या ठिकाणी स्वयंपाकघराची दुरवस्था झालेली आहे. गंजलेल्या वस्तू येथे आहेत. खिडक्यांची दारे तुटलेली आहेत. स्वच्छता येथे नसते. या प्रकारांमुळे विद्यार्थी कंटाळले आहेत. स्वच्छ जागेत अन्न शिजवावे, अशी मागणी अनेकदा केली आहे. या प्रकरणानंतर जेवणाचा कंत्राटदार बदलावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जेवण निकृष्ट दर्जाचे असते, याबाबत गृहपाल, तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीही कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. ‘याबाबत कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल,’ असे सहायक आयुक्त अविनाश देवसटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)