शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वसतिगृहातील जेवणात आढळली पाल

By admin | Updated: February 13, 2017 03:55 IST

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचे चेंबूर नाका येथे ‘संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह’ आहे. या वसतिगृहात रविवारी दुपारच्या जेवणात पाल आढळल्याने एकच खळबळ

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचे चेंबूर नाका येथे ‘संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह’ आहे. या वसतिगृहात रविवारी दुपारच्या जेवणात पाल आढळल्याने एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांनी जेवणाची सुरुवात करण्याआधीच हा प्रकार उघडकीस आल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्यावर होणारा विपरित परिणाम टळल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. राज्यातील विविध भागातून मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह आहे. या वसतिगृहात सध्या एकूण १२० विद्यार्थी राहात आहेत. यामध्ये २० अंध आणि अपंग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रविवारी वसतिगृहात मांसाहारी जेवण असते. ठरल्याप्रमाणे आजही मासांहारी जेवण होते. उद्या परीक्षा असल्यामुळे या वसतिगृहात राहणारा विद्यार्थी राहुल जांबूळकर जेवायला लवकर गेला. सगळ््यात आधी हजेरी लावलेल्या राहुलने जेवण ताटात वाढून घेतल्यावर जेवणाची सुरुवात करण्याआधीच त्याच्या जेवणात पाल असल्याचे त्याला आढळले. त्याने तत्काळ ही माहिती अन्य विद्यार्थ्यांना दिली आणि वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती कळवली. वसतिगृहातील जेवणात पाल आढळल्याचे कळल्यावरही ठेकेदार संध्याकाळी वसतिगृहात दाखल झाला नव्हता. वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत पाहणी केली. या पाहणीनंतर विद्यार्थ्यांना कारवाईचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यापूर्वीदेखील जेवणात अनेकदा काचा, खडे, माती आढळली आहे. या ठिकाणी स्वयंपाकघराची दुरवस्था झालेली आहे. गंजलेल्या वस्तू येथे आहेत. खिडक्यांची दारे तुटलेली आहेत. स्वच्छता येथे नसते. या प्रकारांमुळे विद्यार्थी कंटाळले आहेत. स्वच्छ जागेत अन्न शिजवावे, अशी मागणी अनेकदा केली आहे. या प्रकरणानंतर जेवणाचा कंत्राटदार बदलावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जेवण निकृष्ट दर्जाचे असते, याबाबत गृहपाल, तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीही कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. ‘याबाबत कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल,’ असे सहायक आयुक्त अविनाश देवसटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)