शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयाशी एकनिष्ठ राहून एव्हरेस्ट केले सर

By admin | Updated: May 30, 2016 01:28 IST

५२ दिवसांत सुमारे २९ हजार फुटांवरील एव्हरेस्ट शिखर गाठू शकले, असे प्रतिपादन वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या मालवथा पूर्णा हिने व्यक्त केले.

पुणे : संधी मिळाल्यास वय, जात, भाषा, प्रांत, लिंग व धर्म या सर्व भेदांवर मात केली जाऊ शकते. जगात असे कोणतेही क्षेत्र नाही की त्यात आपण ऐतिहासिक कामगिरी करू शकत नाही. संधी मिळाल्याने मी पहिल्याच प्रयत्नात मोहिमेवर उणे ३५ अंश सेल्सिअस तापमान असताना माझ्या मार्गात ६ मृतदेह पडलेले दिसले. तरीही मी विचलित न होता ध्येयाशी एकनिष्ठ राहून ५२ दिवसांत सुमारे २९ हजार फुटांवरील एव्हरेस्ट शिखर गाठू शकले, असे प्रतिपादन वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या मालवथा पूर्णा हिने व्यक्त केले.एव्हरेस्ट सर केल्यानिमित्त गिर्यारोहक मालवथ हिचा सत्कार सोहळा पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ती बोलत हाती. या वेळी पुण्याचे बिशप रेव्हरंड डॉ. थॉमस डाबरे, बार्टीचे महासंचालक राजेश डाबरे, प्रतापराव बोर्डे, अविचल धिवार, मिलिंद जाधव, जी. टी. रोकडे, पी. जे. रंगारी आदी उपस्थित होते.डाबरे म्हणाले, ‘‘वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करुन मालवथा पूर्णा या भारतीय मुलीने जागतिक विक्रम नोंदवला. परदेशातील गिर्यारोहकांच्या कामगिरीबद्दल चर्चा करण्याऐवजी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मालवथचा आपण सन्मान केला पाहिजे, तिच्या कर्तृत्वाचा भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. या मुलीने एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली. आंबेडकरांनी समान संधी आणि समतेचा विचार आज देशात प्रस्थापित होऊ लागला आहे.’प्रतापराव बोर्डे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन करून या देशात समान संधीच्या चळवळीचा प्रारंभ केला. त्यांच्या या आंदोलनामुळे आज सर्व क्षेत्रांमध्ये बहुजन समाज प्रगती करुन जागतिक स्तरावर स्पर्धा करून सर्वोच्च स्थान मिळवत आहे. मालवथ पूर्णा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.’अविचल धिवार यांनी सूत्रसंचालन केले. विजय धिवार यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद जाधव यांनी आभार मानले.परदेशातील गिर्यारोहकांच्या कामगिरीबद्दल चर्चा करण्याऐवजी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मालवथचा आपण सन्मान केला पाहिजे, तिच्या कर्तृत्वाचा भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. या मुलीने एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली. आंबेडकरांनी समान संधी आणि समतेचा विचार आज देशात प्रस्थापित होऊ लागला आहे, असे म्हणून डाबरे यांनी मालवथा पूर्णा यांचा गौरव केला.