शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

ध्येयाशी एकनिष्ठ राहून एव्हरेस्ट केले सर

By admin | Updated: May 30, 2016 01:28 IST

५२ दिवसांत सुमारे २९ हजार फुटांवरील एव्हरेस्ट शिखर गाठू शकले, असे प्रतिपादन वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या मालवथा पूर्णा हिने व्यक्त केले.

पुणे : संधी मिळाल्यास वय, जात, भाषा, प्रांत, लिंग व धर्म या सर्व भेदांवर मात केली जाऊ शकते. जगात असे कोणतेही क्षेत्र नाही की त्यात आपण ऐतिहासिक कामगिरी करू शकत नाही. संधी मिळाल्याने मी पहिल्याच प्रयत्नात मोहिमेवर उणे ३५ अंश सेल्सिअस तापमान असताना माझ्या मार्गात ६ मृतदेह पडलेले दिसले. तरीही मी विचलित न होता ध्येयाशी एकनिष्ठ राहून ५२ दिवसांत सुमारे २९ हजार फुटांवरील एव्हरेस्ट शिखर गाठू शकले, असे प्रतिपादन वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या मालवथा पूर्णा हिने व्यक्त केले.एव्हरेस्ट सर केल्यानिमित्त गिर्यारोहक मालवथ हिचा सत्कार सोहळा पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ती बोलत हाती. या वेळी पुण्याचे बिशप रेव्हरंड डॉ. थॉमस डाबरे, बार्टीचे महासंचालक राजेश डाबरे, प्रतापराव बोर्डे, अविचल धिवार, मिलिंद जाधव, जी. टी. रोकडे, पी. जे. रंगारी आदी उपस्थित होते.डाबरे म्हणाले, ‘‘वयाच्या १३व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करुन मालवथा पूर्णा या भारतीय मुलीने जागतिक विक्रम नोंदवला. परदेशातील गिर्यारोहकांच्या कामगिरीबद्दल चर्चा करण्याऐवजी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मालवथचा आपण सन्मान केला पाहिजे, तिच्या कर्तृत्वाचा भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. या मुलीने एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली. आंबेडकरांनी समान संधी आणि समतेचा विचार आज देशात प्रस्थापित होऊ लागला आहे.’प्रतापराव बोर्डे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन करून या देशात समान संधीच्या चळवळीचा प्रारंभ केला. त्यांच्या या आंदोलनामुळे आज सर्व क्षेत्रांमध्ये बहुजन समाज प्रगती करुन जागतिक स्तरावर स्पर्धा करून सर्वोच्च स्थान मिळवत आहे. मालवथ पूर्णा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.’अविचल धिवार यांनी सूत्रसंचालन केले. विजय धिवार यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद जाधव यांनी आभार मानले.परदेशातील गिर्यारोहकांच्या कामगिरीबद्दल चर्चा करण्याऐवजी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मालवथचा आपण सन्मान केला पाहिजे, तिच्या कर्तृत्वाचा भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे. या मुलीने एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली. आंबेडकरांनी समान संधी आणि समतेचा विचार आज देशात प्रस्थापित होऊ लागला आहे, असे म्हणून डाबरे यांनी मालवथा पूर्णा यांचा गौरव केला.