शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

निरस बजेट!

By admin | Updated: June 6, 2014 09:16 IST

येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता आघाडी सरकारच्या बजेटकडे आशेने डोळे लावून बसलेल्या सत्ताधारी सदस्यांच्याच पदरी घोर निराशा आली. 1

962 कोटींच्या कर सवलतींचा वर्षाव
विरोधकांना खूश करणारा
शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 1क्क् कोटी
अतुल कुलकर्णी - मुंबई 
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता आघाडी सरकारच्या बजेटकडे आशेने डोळे लावून बसलेल्या सत्ताधारी सदस्यांच्याच पदरी घोर निराशा आली. 12 कोटी जनतेला 962 कोटींच्या विविध कर सवलती दिल्याचे जाहीर केले गेले; मात्र राज्याचा अर्थसंकल्प 4,1क्3 कोटींनी तुटीचा झाला. सवलतींचा वर्षाव करणारे बजेट विरोधकांसाठी कायम टीकेचे लक्ष्य असते. मात्र कोणत्याही नव्या योजना नसलेला, आहे त्या योजनांसाठी निधी न देणारा आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधा:यांना अस्वस्थ करणारा हा अर्थसंकल्प पाहून विरोधकच जास्ती खूश झाल्याचे चित्र आज विधान भवन परिसरात होते.
विधानसभेत अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर विधान परिषदेत राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. विधानसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर असे अनेक जण डुलक्या काढताना दिसले तर नवनिर्वाचित मंत्री अब्दुल सत्तार बजेटनंतर टाळ्या वाजवा असा इशारा करताना राज्याने पाहिले. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय व्यापा:यांना काहीसा दिलासा मिळाला. व्यवसायकर आकारणीची वेतनमर्यादा 5क्क्क् वरून 75क्क् करण्यात आली. तर मूल्यवर्धित कर कायद्याखाली नोंदणीसाठी उलाढालीची मर्यादा 5 लाखांवरून 1क् लाखांवर नेण्यात आली. कापसावरील कर 5 वरून 2 टक्के केला तर उस खरेदीकर चालू आर्थिक वर्षासाठी माफ करण्यात आला आहे. 
लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यासाठीच्या उलाढालीची मर्यादा 6क् लाखांवरून 1 कोटीर्पयत करण्यात आली तर तारण गहाण दस्तांवर मुद्रांक शुल्काची कमाल मर्यादा 1क् लाख केली गेली. सिनेमॅटोग्राफिक फिल्मच्या चित्रपटगृहातील प्रदर्शनाकरिता कॉपीराईटच्या विक्री व लिजवरील कर 1 एप्रिल 2क्क्5 ते 3क् एप्रिल 2क्11 या कालावधीकरिता माफ करून टाकला आहे. शिवाय विमान देखभाल व दुरुस्ती उद्योगास चालना देण्यासाठी विमानाचे सुटे भाग करमुक्त केले आहेत.
 
विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आहेत. त्यामुळे आघाडी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. यातून ब:याच घोषणा होतील, त्यावर निवडणुकीत वातावरण तयार करता येईल अशा अपेक्षा घेऊन सत्ताधारी बाकावरचे सदस्य, मंत्री सभागृहात आले; पण त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे त्यांची नाराजी आणि या अशा बजेटमुळे खुललेली विरोधकांची कळी असे चित्र आज विधिमंडळ परिसरात होते.
 
2क्14-15साठी रस्ते विकासाकरिता 2836 कोटींचा नियतव्यय. जिल्हा परिषदेंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी 456.55 कोटींची तरतूद.
 
अंदाजे 14,574 कोटी खर्चाच्या प्रकल्पास केंद्र शासनाची तत्त्वत: मान्यता. भूसंपादनाची व निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरू.
 
खाजगीकरणाच्या माध्यमातून बंदरांचा विकास. त्याद्वारे रेवस आवारे, दिघी, धामण खोल जयगड, आंग्रे, विजयदुर्ग, रेडी या सहा बंदरांचा विकास. धामणखोल, जयगड बंदरात 2 धक्के कार्यान्वित.